राज्यात आश्रमशाळांतील शिक्षण सेवकांच्या मानधनात १०,००० नि वाढ ! – Shikshak Bharti 2023

Maharashtra Shikshak Bharti 2023 for 30000 posts

Maharashtra Shikshak Bharti 2023

Shikshak Sevak Bharti updates about Ashram School in Maharashtra State. It has been decided to increase the remuneration of the Shikshak Sevak of the Ashram Schools of other backward Bahujan welfare department like the Shikshak Sevak under the jurisdiction of the school education department. The government decision in this regard was issued on Monday.
The remuneration of primary and higher Primary Shikshak Sevak in ashram schools has been increased from 6 thousand to 16 thousand, while the remuneration of secondary Shikshak Sevak has been increased from 8 thousand to 18 thousand and higher secondary-junior college education has been increased from 9 thousand to 20 thousand.
This salary hike will be effective from January 1, 2013. This decision will benefit the Shikshak Sevak in the primary, secondary and higher secondary ashram schools of the division of Vimukt caste, nomadic tribes, Vidyaniketan and ashram schools for the boys and girls of sugarcane workers.
Similarly, a study group of six members has been appointed for the study of various aspects of the service of the employees of ashram schools under the विजाभज category.

आश्रमशाळांतील शिक्षण सेवकांच्या मानधनातही वाढ प्राथमिकचे ६ हजारांवरून १६ हजार

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
  1. शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील शिक्षण सेवकांप्रमाणेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळांतील शिक्षण सेवकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला.
  2. आश्रमशाळांतील प्राथमिक व उच्च प्राथमिकच्या शिक्षण सेवकांचे मानधन ६ हजारांवरून १६ हजार करण्यात आले आहे, तर माध्यमिकचे ८ वरून १८ हजार आणि उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधन ९ हजारांवरून २० हजार इतके करण्यात आले आहे.
  3. १ जानेवारी २०१३ पासून ही मानधन वाढ लागू होईल. विभागाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला- मुलींसाठीच्या आश्रमशाळांमधील शिक्षण सेवकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
  4. त्याचप्रमाणे विजाभज प्रवर्गातील आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक विविध बाबींच्या अभ्यासासाठी सहाजणांच्या अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Due to Corona, teachers were not recruited for some time. However, the TAIT exam has been conducted from February to March 2023 and through this the state government is going to recruit nearly 30,000 teachers. The TAIT exam for the recruitment of teachers will be conducted twice in a year. At present we have got permission to fill 80% of the 30 thousand posts. The remaining posts will also be filled up thereafter. At present, there are approximately 27,000 posts in primary schools and 13,000 posts in secondary schools in Maharashtra. It is claimed by the teachers’ unions that 30,000 posts will be filled, which will reduce the additional pressure on teachers. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

राज्यात होणार ३०,००० शिक्षकांची मेगा भरती !

राज्यात शिक्षकांची मेगा भरती करण्यात येणार आहे. ही भरती नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली. होणारी शिक्षक भरती दोन टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले. शिक्षक भरती संदर्भात दीपक केसरकर म्हणाले की, ‘नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. असे केसरकर म्हणाले. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  1. पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल. आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल.
  2. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल.’केसरकर म्हणाले, कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र, फेब्रुवारी ते मार्च २०२३ मध्ये टेट परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास ३० हजार शिक्षक भरती करणार आहे. शिक्षकांचा पदभरतीसाठी टेट परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणार आहे. सध्या ३० हजारपैकी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी आम्हाला मिळाली आहे. उर्वरित पदेही त्यानंतर भरली जातील. सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत, असा दावा शिक्षक संघटनांकडून केला जातो.आता त्यातील तीस हजार पदे भरण्यात येणार असल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी होणार आहे.
  3. शिक्षकांच्या बदलीबाबत केसरकर म्हणाले. – शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसंच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, असं केसरकर यांनी म्हटलं. शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावे लागेल, असं दीपक केसरकर म्हणाले.
  4. महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण – विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्मबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करु आणि त्यानंतर ठरवलं जाईल, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. ऑर्डर दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. स्वतःचे अधिकार वापरुन ज्यांनी आधीच युनिफॉर्म संदर्भात ऑर्डर दिलेली आहेत त्यांनी बैठकीसाठी विचारणा केली आहे. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. स्काऊट गाईड, एनएसएस हे कंपल्सरी करणार आहोत. त्यांना एक पर्टिक्युलर युनिफॉर्म दिला तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही. बूट सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत, असे केसरकर म्हणाले.

Regarding teacher recruitment, Deepak Kesarkar said, “We are planning to recruit these teachers before the start of the new academic year. In the first phase, 30,000 teachers will be recruited and in the second phase, around 20,000 teachers will be recruited. After the completion of Aadhaar verification of students, the second phase teachers The number will be known regarding the recruitment. Hundred percent teachers will be recruited. The set should be approved for that. Because this post will be recruited according to reservation. These candidates will be interviewed and recruited.” Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती करणार : दीपक केसरकर

“पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल,” अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसंच आधार वेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल, असंही त्यांनी त्यांनी म्हटलं. दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

शिक्षक भरती संदर्भात दीपक केसरकर म्हणाले की, “नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. आधार वेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल.”

शिक्षकांच्या बदलीबाबत केसरकर म्हणाले…

  • शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसंच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, असं केसरकर यांनी म्हटलं.
  • शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, असं दीपक केसरकर म्हणाले.

एकच युनिफॉर्मबाबतच्या निर्णयासंदर्भात एक-दोन दिवसात विचार करु’

तसंच विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्मबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करु आणि त्यानंतर ठरवलं जाईल, असं दीपक केसरकर यांनी स्षष्ट केलं. ऑर्डर दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. स्वतःचे अधिकार वापरुन ज्यांनी आधीच युनिफॉर्म संदर्भात ऑर्डर दिलेली आहेत त्यांनी बैठकीसाठी विचारणा केली आहे. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. स्काऊट गाईड, एनएसएस हे कंपल्सरी करणार आहोत. त्यांना एक पर्टिक्युलर युनिफॉर्म दिला तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही. बूट सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत.


Education Minister Deepak Kesarkar has explained that the 33,000 vacant teacher posts in the state will be filled by June 2023 when the implementation of the new education policy has started; In the new education policy, the Chief Minister has guaranteed the empowerment of primary schools. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पवित्र पोर्टल शिक्षक भरती ऑगस्टमध्ये! – Pavitra Portal Shikshak Bharti

जूनपर्यंत नवीन शिक्षक शाळांत येणार; ३३ हजार जागांसाठी तब्बल पाच लाख अर्ज

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असताना रिक्त असलेल्या राज्यातील ३३ हजार शिक्षकांच्या जागा जूनपर्यंत भरल्या जातील, असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे; तर नव्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शाळांच्या सक्षमीकरणाची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

  1. महाराष्ट्रात बऱ्याच शाळांचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ऑनलाईन लिंक न झाल्यामुळे ६०० शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते. मात्र आधार कार्ड लिंक न होण्याचे कारण शिक्षण विभागाची वेबसाईट कार्यरत नसल्याचे सांगितले जात आहे. आजही काही शाळांच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लिंक झालेले नाही. त्यामुळे शिक्षक भरतीसमोर प्रश्नचिन्ह उभे आहे. तथापि भरती प्रक्रिया गतिमान केल्यामुळे जूनच्या नवीन शैक्षणिक वर्षात नवे शिक्षक मिळतील असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
  2. शिक्षकांची सर्वाधिक पदे ही ग्रामीण भागात रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जवळपास ३ हजार शाळा एकशिक्षकी आहेत. २० पटसंख्येच्या राज्यात दोन हजार शाळा असून, या शाळा बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला होता. मात्र आता शिक्षण विभागाने यावर क्लस्टरची मात्रा शोधली आहे. पुण्यातील पानशेत धरण भागातील २० पटसंख्येच्या १६ शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार केली आहे. त्यामुळे ३२० विद्यार्थ्यांची एक शाळा सुरू होत आहे. राज्यात २० पटसंख्येच्या २ हजार शाळांमध्ये क्लस्टरचा नवा प्रयोग राबविला जाणार आहे. पुण्यातील ३२० विद्यार्थ्यांसाठी १६ शाळांमधील शिक्षक उपलब्ध असून, पहिली ते आठवीपर्यंत हे शिक्षक कार्यरत राहणार आहेत.





Maharashtra Education Department just give the hope of recruitment of 12,500 teachers was shown in the state through the Pavitra Portal. Out of them, only 5,500 to 6,000 teachers were recruited. It’s been at least five years. Now the recruiting 30,000 new teachers was shown it just and hope. Therefore, the government does not want to recruit teachers, but only gives hopes to the candidates. Therefore, the organization is now going to hit the streets for teacher recruitment. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

  1. राज्यात 2018 ते 2023 या चार वर्षांत साडेबारा हजार शिक्षकभरतीच्या केवळ वल्गनाच झाल्या. प्रत्यक्षात शिक्षकांच्या केवळ सहा हजारांवर जागा भरण्यात आल्या आहेत. त्यातच आता 30 हजार शिक्षकभरतीची नवी घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी घेण्यात आली. तरीदेखील शिक्षकभरतीबाबत कोणतीही हालचाल शिक्षण विभागाकडून होत नाही. त्यामुळे पहिलीच भरती अर्धवट असताना नव्याने 30 हजार शिक्षकभरतीचे गाजर कशासाठी, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांनी विचारला आहे.
  2. राज्यात 2012 पासून शिक्षकभरतीला बंदी घालण्यात आली होती. परंतु, 2017 साली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकभरतीसाठी अध्यादेश काढला आणि 2018 साली अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेऊन शिक्षकभरतीला सुरुवात करण्यात आली. राज्यात साडेबारा हजार शिक्षक भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातील पाच ते सहा हजार शिक्षक शाळांमध्ये भरण्यात आले.
  3. त्यानंतर पुन्हा नव्याने शिक्षकभरतीसाठी अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी घेण्यात आली. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, शिक्षकभरतीसाठी अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. पुढील महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकभरती करणार नाही तर मग कधी करणार? असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत. यावर शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी हात वर केले आहेत.
  4. राज्यात साडेबारा हजार शिक्षकभरतीचे गाजर दाखविले होते. त्यापैकी केवळ साडेपाच-सहा हजार शिक्षकांची भरती करण्यात आली. याला किमान पाच वर्षांचा कालावधी झाला आहे. आता नवीन 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचे गाजर दाखविण्यात आले. त्यामुळे शासनाला शिक्षकभरती करायचीच नसून उमेदवारांना केवळ गाजर दाखवत झुलवायचे आहे. त्यामुळे शिक्षकभरतीसाठी आता संघटना रस्त्यावर उतरणार आहे.





Shikshak bharti latest updates – The state government has decided to recruit 30,000 shikshak in the Maharashtra state. Ranjit Singh Deol, Principal Secretary of the State Education Department, has informed that until all students’ Aadhaar verification is done, the exact positions of teachers will not be known and recruitment will not be possible. Therefore, he has indicated that this recruitment will not take place till September. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर राज्यातील तीस हजार शिक्षकांची भरती

राज्यातील तीस हजार शिक्षकांची भरती करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. तर जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत शिक्षकांच्या नेमक्या जागा समजणार नाहीत आणि भरती करता येणार नाही, अशी माहिती राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरपर्यंत ही भरती होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

  1. राज्यातल्या शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये राज्य सरकारने नुकतीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढ केली आहे. त्यानंतर राज्यातील हजारो शिक्षकांची पदे रिक्त असल्याबाबत ही पदे भरावी यासाठी सातत्याने मागणी होत असताना राज्य सरकारने सुमारे 30 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
  2. टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत उमेदवार: – राज्यातील डीएड झालेले अनेक विद्यार्थी हे टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा न झाल्यामुळे हे विद्यार्थी शिक्षक म्हणून होणाऱ्या भरतीसाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे सरकारने त्वरित शिक्षक पात्र परीक्षा घ्यावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देवल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही टेट ही परीक्षा घेतली आहे. टेट परीक्षेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत असून गरजेप्रमाणे या विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाईल. तसेच टीईटी परीक्षेच्या संदर्भातही आम्ही सकारात्मक असून लवकरच ती परीक्षा सुद्धा घेतली जाईल असे देवल यांनी सांगितले.
  3. विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन: – दरम्यान राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या यावर शिक्षकांची संख्या अवलंबून असते. जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या प्रमाणात शिक्षक भरती केली जाते किंवा एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर त्या शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये वर्ग केले जातात. यासाठी राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन करून नेमकी विद्यार्थी संख्या किती आहे, याचा आढावा घेतला जात आहे. राज्यात एकूण दोन कोटी तेरा लाख विद्यार्थी आहेत. यापैकी दीड कोटी विद्यार्थ्यांची आधार तपासणी झाली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची आधार तपासणी लवकरच पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
  4. संच मान्यतेच्या प्रतीक्षेत: – एकदा ही सर्व संख्या हाती आल्यानंतर त्यानुसार शिक्षक भरती लगेच करण्यात येईल, त्यासाठी संच मान्यता घेण्यात येईल. एक सप्टेंबरला या सर्व गोष्टींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार संच मान्यता घेऊन पुढील कार्यवाही केली जाते. त्याचप्रमाणे आताही संच मान्यता मिळाल्यानंतर शिक्षक भरती केली जाईल असेही देवल यांनी सांगितले.

https://mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx published the latest updates and advertisement for Candidates given Teacher Aptitude and Intelligence Test 2017 with Interview under Recruitment Type 196 in Private Management etc. 6th to etc. Facility has been provided to fill priority order of vacancies in Group 12 from 13/04/2023 to 25/04/2023. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पवित्र पोर्टल शिक्षक भरती जुलै-ऑगस्टमध्ये होणार! – Pavitra Portal Shikshak Bharti

Maha Teachers Recruitment Portal

As per the information of education department, about 67,000 posts are currently vacant for teachers posts. Against this backdrop, 50% of the posts will now be filled. There are 17,000 posts in private organizations and 15,000 posts in government i.e. local bodies. There is a requirement of ‘Tate’ to become a teacher and his examination has been conducted recently and now the result of the examination will be announced this month itself. After the results, the merit list will be published and the teacher recruitment will start. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शिक्षकांचा अनुशेष भरल्याशिवाय शैक्षणिक प्रगती अशक्यच; ३२ हजार शिक्षकांची लवकरच भरती

राज्य सरकारने ६६ हजार ७०० रिक्तपदांपैकी ३२ हजार शिक्षकांची म्हणजे जवळपास ५० टक्के पदभरतीचा निर्णय घेतला आहे. त्यातून काहीसा फरक पडेल, पण शिक्षकांचा अनुशेष भरून काढल्याशिवाय शैक्षणिक प्रगती अशक्यच आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात दहा हजारांची भरघोस वाढ केली आहे. त्यानुसार, पहिली तीन वर्षे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांवरील शिक्षण सेवकाला १६ हजार तर माध्यमिक शाळांवरील शिक्षण सेवकांना १८ हजार आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना २० हजार मानधन मिळणार आहे. मात्र, शिक्षणासारख्या पायाभूत सुविधेत रिक्त पदांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढल्याशिवाय शैक्षणिक प्रगतीचा आलेख पूर्णपणे उंचावणार नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

Teachers Recruitment 2023

  1. राज्यातील खासगी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास दहा वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामुळे सध्या तब्बल ६७ हजार पदे रिक्त झाल्याची शिक्षण विभागाची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर, आता ५० टक्के पदे भरली जातील. त्यात खासगी संस्थांमधील १७ हजार तर शासकीय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १५ हजार पदे आहेत. शिक्षक होण्यासाठी ‘टेट’चे बंधन असून त्याची परीक्षा नुकतीच पार पडली असून आता या महिन्यातच परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. निकालानंतर गुणवत्ता यादी प्रकाशित होऊन शिक्षक भरती सुरु होईल.
  2. एकाचवेळी तब्बल ३२ हजार ३०० शिक्षक भरती होण्याची दहा-बारा वर्षांतील पहिलीच वेळ असेल. शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षकांवर अतिरिक्त कामाचाच ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाचवा, सहावा अन् सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही अनेक शिक्षकांनी स्वेच्छानिवृत्तीचा सुखकर मार्ग चोखाळला. बहुतांश शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याचे सर्वेक्षण आहे. या सर्व प्रकारानंतर शिक्षकांची हवी तशी भरती झाली नाही. शैक्षणिक संस्थांचे विविध प्रकारचे अनुदान पूर्वीसारखे राहिले नाही. संस्थांना शासकीय यंत्रणेबरोबर सतत लढावे लागते. त्यातच शिक्षकांची कमी झालेल्या संख्येचे त्यांच्यासमोर मोठे आव्हानच होते.
  3. राज्यातील विविध खासगी संस्था व शासकीय शिक्षकांच्या ३२ हजार ३०० जागा भरण्यासाठी शासनाने परीक्षा घेतली, तेव्हा तब्बल दोन लाख ४० हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. सध्याच्या स्पर्धात्मक युगात रिक्त जागा आणि उमेदवार, यांचे प्रमाण मोठे व्यस्त झाले आहे. शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षणासारख्या पायाभूत रचनेवर मोठा ताण पडत होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे उपलब्ध शिक्षकांना पुरेसा वेळ देता येत नव्हता. शैक्षणिक गळतीचे प्रमाण वाढण्यासाठी हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरत होता. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता जूनपूर्वी होणार असल्याने बेरोजगार उमेदवार व शैक्षणिक संस्था चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
  4. ‘खासगी’ शिक्षक निवडीत वशिलेबाजी बंद होईल – पूर्वी बहुतेक शैक्षणिक संस्था आपल्या नात्यातील उमेदवारांना प्राधान्य देत होत्या. परंतु, शासनाच्या नवीन निकषांनुसार ‘टेट’ उत्तीर्णचे बंधन आणि एका जागेसाठी दहा उमेदवारांच्या मुलाखतीचे बंधन घातल्याने त्यातून एकाची निवड करणे क्रमप्राप्त आहे. निवड नाकारणारा न्यायालयात किंवा शालेय शिक्षण आयुक्त तथा शिक्षण संचालकांकडे दाद मागायला गेला, तर संबंधित शैक्षणिक संस्थेला त्याचे अचूक कारण द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वशिलेबाजीचा प्रकार (शंभर टक्के नसला तरी) काही प्रमाणात का होईना कमी होईल, असे वाटते.

As per the today’s news Minister Kesarkar said that 30 thousand teachers will be recruited in the state before the start of the new academic year through the school education department and their names will appear on the holy portal. It is the policy of the state government to adjust the additional teachers in the state to other places. Kesarkar also said on this occasion that action will be taken against the officers and employees found guilty in the TET examination.

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची  भरती होणार असून त्यांची नावे पवित्र पोर्टलवर येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक भरतीबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार, दिलीप वळसे- पाटील, धनंजय मुंडे, रोहित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. देवराव होळी, हरीभाऊ बागडे आदींनी प्रश्न विचारला होता.

 केसरकर म्हणाले, कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र, फेब्रुवारी ते मार्च २०२३ मध्ये टेट परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास ३० हजार शिक्षक भरती करणार आहे. शिक्षकांचा पदभरतीसाठी टेट परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणर आहे. सध्या ३० हजारपैकी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी आम्हाला मिळाली आहे. उर्वरित पदेही त्यानंतर भरली जातील

 ६ वर्षांनंतर टेट परीक्षा 

 २०१७ नंतर आता २०२३ मध्ये टेट परीक्षा घेण्यात येत आहे. शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी मिळाल्याने ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. टेट परीक्षेत दोषी ठरलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.


एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे..!

As per the today’s news Minister Kesarkar said that action is being taken regarding the recruitment of teacher posts in the Maharashtra state. 50% of the total acceptance of teacher posts will be recruited. The necessary exams have been completed recently. He said that after the recruitment of teachers, non-teacher recruitment will be done. Teachers Post recruitment will help to solve the problem of vacancies to some extent. Also, Minister Kesarkar informed that the regular functioning of the schools will be smooth and the students will not be harmed. As batch approval is based on number of students, Aadhaar linking is in progress. After that, the number of students will be known and the teachers will not be additional, he said.

  • शाळांची संचमान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असते. त्यामुळे एकूण विद्यार्थी आणि त्यासाठी आवश्यक शिक्षकांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. तरीही सध्याची रिक्त पदे लक्षात घेता शिक्षक पद भरतीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
  • मंत्री केसरकर म्हणाले की, राज्यात शिक्षक पद भरती करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे. एकूण मान्यतेच्या 50 टक्के शिक्षक पद भरती केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. शिक्षकभरती नंतर शिक्षकेतर भरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • पदभरतीनंतर रिक्त पदांचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. तसेच शाळांमध्ये नियमित कामकाज सुरळीत होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असल्याने आधार जोडणीचे काम सुरू आहे. त्यानंतर विद्यार्थी संख्या कळू शकेल आणि शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सुधाकर अडबाले, आमशा पाडवी, अभिजित वंजारी, जयंत पाटील, कपिल पाटील, अरुण लाड आदींनी सहभाग घेतला.

As per the latest updates of shikshak bharti 32,300 shikshak to be recruited in April-May! 17000 teachers will be recruited in private schools and 15000 posts will be filled in government schools. After the ‘Maha TAIT’ result, the list of candidates will be uploaded on the Pavitra portal as per the merit list for the recruitment of teachers in Zilla Parishad, Municipality, Municipal Council and Municipal Schools. Accordingly, the concerned candidates will get direct placement in the local government schools. The result of ‘Maha TAIT’ exam will be announced in 15 days. After that, the merit list will be released and the recruitment of teachers from Zilla Parishad, Municipalities, Municipal schools along with private primary, secondary and higher secondary schools will be done in the months of April-May. Approximately 32 thousand 300 teachers will be recruited simultaneously. Senior sources in the education department informed that this is the largest recruitment in 15 years. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

ZP Nashik Teacher Bharti-राज्यात उर्दू शिक्षकांची 3 हजार पदे रिक्त

Teachers Recruitment 2023 for 32000

  • ‘टेट’ परीक्षेचा निकाल आता १५ दिवसांत जाहीर होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि एप्रिल-मे महिन्यांत खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमधील शिक्षकांची भरती केली जाणार आहे. एकाचवेळी साधारणत: ३२ हजार ३०० शिक्षकांची भरती होणार आहे. पंधरा वर्षांतील ही सर्वात मोठी भरती असल्याची माहिती शिक्षण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
  • सेवानिवृत्ती, आकाली मृत्यू, पटसंख्या वाढ, स्वेच्छानिवृत्ती अशा विविध कारणांमुळे राज्यातील एक लाख शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे वाढली आहेत. मागील सहा वर्षांत शिक्षक भरती न झाल्याने आता रिक्त पदे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दोन लाख ४० हजार उमेदवारांची ऑनलाइन ‘टेट’ परीक्षा नुकतीच पार पडली. त्याचा निकाल २० मार्चपूर्वी जाहीर केला जाईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त महेश पालकर यांनी दिली.
  • ‘टेट’ निकालानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद व महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीसाठी मेरिट यादीनुसार उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये थेट नियुक्ती मिळणार आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षक भरती करताना एका जागेसाठी दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे. मुलाखतीतून त्यातील एका उमेदवाराची निवड केली जाईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना दहापैकी कोणत्या उमेदवाराला घ्यायचे हा अधिकार त्या संस्थेचा असणार आहे.
  • विद्यार्थ्यांच्या ‘आधारा’वर संचमान्यता – राज्यातील खासगी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील सहा वर्षांत शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे तब्बल ६७ हजार शिकांची पदे रिक्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच शाळांची संचमान्यता होणार आहे. २०२२-२३ च्या संचमान्यतेवर शिक्षक भरती राबविली जाणार आहे. मात्र, त्यासाठी शाळांमधील आधार क्रमांक असलेल्या आणि विशेषत: ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफाय झाले, तीच पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार त्या शाळांमधील रिक्त पदे निश्चित करून पदभरतीस मान्यता दिली जाणार आहे.

शिक्षकांच्या रिक्तपदांची सद्यस्थिती

  • ‘खासगी’ रिक्त पदे – ३४,६००
  • शासकीय रिक्त पदे – ३२,४००
  • शिक्षकांची एकूण रिक्त पदे – ६६,७००
  • भरती होणारे शिक्षक – ३२,३००

Maharashtra Shikshak Bharti 2023 for 30 thousand posts will be held in May 2023. As 30 thousand teachers will be recruited in the state in the next two months, this is going to be a big relief for the youth who want to become teachers. Rural Development Minister Girish Mahajan gave information about this. Minister Girish Mahajan has said that preparation for this teacher recruitment is underway and detailed information will be given soon. The posts of teachers in schools in the state were largely vacant. Also, currently schools are closing in many places due to lack of enrollment. Despite the availability of qualified D.ed teachers, teachers were not recruited for the past several years. But now, soon there will be recruitment of 30,000 teacher posts in the state. School Education Minister Deepak Kesarkar also gave the same information while replying to a written question in the Legislative Assembly. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

  1. राज्यात लवकरच मोठी शिक्षक भरती होणार आहे. 28 ते 30 हजार जागांसाठी ही शिक्षक भरती होणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. “जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये 30 हजारांच्या आसपास कमी शिक्षक संख्या आहेत. या ठिकाणी लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी ऑनलाईन इंटरव्ह्यूव झालेत. यात पात्र ठरलेल्या लोकांना लवकरच ठिकठिकाणच्या शाळांमध्ये पाठवलं जाईल. पहिल्या टप्प्यात येत्या महिनाभरात 15 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पार पडेल”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
  2. शिक्षण क्षेत्रातील बेरोजगार तरुणांसाठी लवकरच लॉटरी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिक्षक भरतीकडे डोळे लाऊन असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे…
  3. राज्यात पुढील दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याने आता शिक्षक होऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हा मोठा दिलासा असणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याविषयीची माहिती सभागृहात दिली. या शिक्षक भरती बाबतची तयारी सुरू असून लवकरच सविस्तर माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. तसेच, सध्या पटसंख्या अभावी अनेक ठिकाणी शाळा बंद होत आहेत. पात्रता धारक D.ed शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होत नव्हती.  परंतु, आता लवकरच राज्यात तीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील तशी माहिती विधानसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना दिली होती. त्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली.
  4. आमदार राजेश एकडे आणि अन्य काही सदस्यांनी विधानसभेत काल यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास होत असलेला विरोध, त्याबरोबरच शिक्षक उपलब्ध असतानाही भरती न झाल्यामुळे डी.एड आणि बी.एड झालेल्या बेरोजगार तरुणांना वणवण भटकावे लागत आहे तसेच, बेरोजगारीची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली आहे, असे वारंवार सांगितले जात होते.सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक झाल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे उपप्रश्न या तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नांना लेखी उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 30 हजार शिक्षकांची पदे भरती जातील अशी माहिती दिली. या भरतीमुळे तरुणांना मोठा दिलासा मिळेल, त्याबरोबरच ग्रामीण  भागातील विद्यार्थांना हक्काचे शिक्षक मिळून शिक्षणाचा दर्जा उंचावेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

Maha TAIT Exam 2023- टेट’ परीक्षा ऑनलाईन लिंक उपलब्ध ; लगेच अर्ज करा

Maha TET 2023- १० हजार केंद्रांवर फेब्रुवारीअखेरीस TET परीक्षा





The decision to increase the salary of teachers and non-teaching staff in the state has been taken through the state government. But due to the code of conduct for the election of teachers and graduates constituencies, its implementation was stalled. As soon as these elections were over, the government decision was issued in this regard. Education Minister Deepak Kesarkar announced that teachers will get increased salary from January 1, 2023.

Pavitra Portal – खुशखबर! राज्यातील रखडलेली शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार

Pavitra Portal – खुशखबर! राज्यात लवकरच भरली जाणार शिक्षकांची 30 हजार पदे

 Shikshak Mandhan Vadh – शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती. 

 राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पहील्या तीन वर्षाकरीता मानधन तत्वावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक २५.११.२००५ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. सदर शासन निर्णयानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले होते.

  •  निवडणुका  पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून १ जानेवारी २०२३ पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.  पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
  •  मराठीबाबत ग्रेडिंगचा पर्याय शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. मात्र ज्यांनी पहिलीपासून मराठी शिक्षण घेतलेले नाही अशांना मराठी अडचणीचे ठरू शकते. यासाठी ग्रेडिंगच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे केसरकर म्हणाले.
  •  शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनात झालेली वाढ, वाढती महागाई या सर्व बाबींचा विचार करुन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

 येथे पहा सुधारित मानधन 

GR शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक ११.१२.२०२० नुसार चतुर्थश्रेणी कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पद व्यपगत करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार शाळांना चतुर्थश्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. तथापि, अनुकंपा तत्वावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होत असल्याने या प्रकारे चतुर्थश्रेणी पदावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाच वरील तक्त्यातील मानधन लागू असेल. तसेच जे चतुर्थश्रेणी कर्मचारी दि.११.१२.२०२० पूर्वी चतुर्थश्रेणी संवर्गात सेवक या पदावर नियुक्त करण्यात आले आहेत व ज्यांचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आलेला नाही, त्यांना देखील वरील मानधन अनुज्ञेय राहील.


As many as 5 state-level Aptitude and Intelligence Tests (TAIT) for teacher recruitment and the national-level Central Teachers’ Association examination for the post of primary teachers have come in the same week. The State Examination Council has announced the schedule for teacher recruitment under the holy portal and the online examination will be conducted from February 22 to March 3.

शिक्षक भरतीसाठी तब्बल ५ होणारी राज्यस्तरावरील अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) आणि देशपातळीवर होणारी केंद्रीय शिक्षक संघटन ही प्राथमिक शिक्षकपदासाठी होणारी परीक्षा एकाच आठवड्यात आली आहे. यामुळे शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या राज्यातील हजारो तरुण उमेदवारांपुढे कोणत्या परीक्षेला प्राधान्य द्यावे, असा प्रश्न उभा आहे. पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ऑनलाइन परीक्षा २२ फेब्रुवारीपासून ते ३ मार्चपर्यंत आयोजित केली जाणार आहे. 

राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे (टीएआयटी) वेळापत्रक जाहीर केले. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरू झाली. परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. ‘टीएआयटी’कडे राज्यातील पाच लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, देशपातळीवरील केंद्रीय विद्यालयासाठी होत असलेली परीक्षा २१ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीमध्ये होणार आहे. अभियोग्यतेसाठी राज्यातील हजारो शिक्षक तयारी करीत असताना एकाच वेळी येणाऱ्या दोन परीक्षांमुळे मात्र, त्यांचा हिरमोड झाला आहे. याशिवाय इतर अनेकी परीक्षा याच कालावधीत होत असल्याने या उमेदवारांना इतर परीक्षांना मुकावे लागणार असल्याची भीती सतावत आहे


The ‘Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT)-2022’ exam has been conducted online for teacher recruitment in Maharashtra. For this, applications are invited from eligible candidates through online mode. Last date to apply is 8th February 2023..  Eligible applicants need to submit online application form through the given link.

महाराष्ट्रात शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 08 फेब्रुवारी 2023  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.


Maharashtra Shikshak Bharti 2023– Recruitment of 30 thousand teachers in three months, Devendra Fadnavis’ big announcement. Deputy Chief Minister Devendra Fadnavis has announced the recruitment of 30 thousand teachers in the Teacher-Graduate Constituency elections. Read More details are given below.

Maha TET 2023- १० हजार केंद्रांवर फेब्रुवारीअखेरीस TET परीक्षा

पुढील तीन महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. ते शिक्षक मेळाव्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘2012 पासून शिक्षक भरती बंद होती, पुढच्या 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार आहोत. निवडणुका आहेत म्हणून फक्त घोषणा करायची हे आम्ही कधी करत नाहीत.’ सर्वच जिल्ह्याकडून वाढीव मागण्या आल्या आहेत. मात्र आचारसंहिता असल्यामुळे सर्वच मागण्या मान्य करणे किंवा नव्या घोषणा करणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकरभरती करण्यात येणार आहे. याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने दोन महिन्यापूर्वी केली होती. राज्यात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. त्यातच आता फडणवीसांनी 30 हजार शिक्षकांच्या भरती करण्याची घोषणा केली आहे.

एका शिक्षकामुळे देशात अनेक मान्यवर तयार होतात. मी ज्या शाळेत, कॉलेजमधील शिक्षक मला कुठेही दिसले तर मला आदर वाटतो. आपली शाळा आपले शिक्षक आपण कधीच विसरत नाही. देश आज वेगाने प्रगती करतोय, गेल्या  पाच सात वर्षात देश 11 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर आला आहे, असे फडणवीस म्हणाले.

आज पाकिस्तान मध्ये गहू पीठासाठी मारामारी होतेय, श्रीलंकेत महागाई शिगेला पोहचली आहे. पेट्रोल सुद्धा मिळत नाही, याउलट भारत प्रगती करतोय. जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या अधिक आहे, जगात शिक्षण घेणारी पिढी सर्वात जास्त आहे. माझ्यासमोर बसलेले शिक्षकच ही पिढी घडवणारे आहेत. हळू हळू शिक्षक पद्धती वैश्विक करण्याचा विचार आपल्याला या पुढे करायचा आहे. शिक्षण क्षेत्रात जाणारा पैसा हा खर्च नसतो ती गुंतवणुक असते. या गुंतवणुकीचा मानव संसाधनाच्या रूपाने परतावा मिळत असतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Shikshak Bharti 2023- Latest updates regarding Shikshak Bharti 2023 is that Due to non-recruitment of scheduled sector teachers, 7 thousand 187 posts are vacant since 2014. Read More details regarding Teachers Recruitment 2023 are given below.

 राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील  वर्षानुवर्षे भरती न केल्यामुळे शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त आहेत. एकट्या पालघर जिल्ह्यात मराठी माध्यमाची सर्वात जास्त ४४८१, तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी १७ पदे रिक्त आहे. उर्दू माध्यमाची पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त ३६ पदे रिक्त आहेत, तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी ३ पदे रिक्त आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र एकही जागा रिक्त नसल्याचे दाखविण्यात आले आहे. याबाबतची माहिती शासनाने शिक्षक बदली पोर्टलवर ४ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर केलेली आहेत.

आदिवासीबहुल भागात बिगर आदिवासी कर्मचारी कामात फारसा रस घेत नाही. कर्मचाऱ्यांना स्थानिक बोलीभाषा अवगत नसल्यामुळे आदिवासींना सेवा, सुविधा पुरविण्यात अडचणी येतात. अनुसूचित क्षेत्रात विविध सेवा, सुविधांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्यपालांनी राज्यघटनेतील ५व्या अनुसूचितील परिशिष्ट ५ (१) नुसार अधिसूचना काढून १७ संवर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीमधून भरण्याचा निर्णय नऊ वर्षांपूर्वीच घेतला आहे. यात ‘शिक्षक’ हे पद आहे.

 अनुसूचित क्षेत्रातील शिक्षकांची भरतीच करण्यात न आल्यामुळे ७ हजार १८७ पदे सन २०१४ पासून रिक्तच आहेत. अनुसूचित क्षेत्रात व बिगर अनुसूचित क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये दरवर्षी बदली, सेवानिवृत्ती व इतर कारणांमुळे रिक्त होणाऱ्या पदांपैकी अनुसूचित क्षेत्रात रिक्त होणारी पदे, जास्तीत जास्त एकूण रिक्त पदांच्या २० टक्के पदे दरवर्षी स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरावयाची आहेत. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून, राज्यपालांच्या आदेशालाही शासन-प्रशासन जुमानत नसल्याचे वास्तव समोर आले आहे

राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्ष

राज्यपाल यांनी ९ जून २०१४, १४ ऑगस्ट २०१४, ३१ ऑक्टोबर २०१४, ३ जून २०१५ रोजी अधिसूचना काढलेल्या आहेत. या अधिसूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ मार्च २०१५ व २६ जून २०१५ रोजी शासन निर्णय काढले. यानंतरही राज्यपाल यांनी ९ ऑगस्ट २०१६ आणि २३ नोव्हेंबर २०१६ रोजी अधिसूचना काढल्या. परंतु या अधिसूचनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अद्यापही अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्गातील पदे भरण्यात आलेली नाहीत.

जिल्हा, माध्यम निहाय शिक्षकांची रिक्त पदे
जिल्हा, मराठी, उर्दू
१) अहमदनगर २८, ००
२) अमरावती १६५, १४
३) धुळे ५३, ७
४) गडचिरोली २६५, ००
५) जळगाव १८२, १२
६) नांदेड १२६, ००
७) नंदुरबार ३००, ३१
८) नाशिक ४१७, ० ३
९) पालघर ४४८१, ३६
१०) पुणे १७, ००
११) ठाणे ५३३, १४
१२) यवतमाळ ५०३, ००
१३) चंद्रपूर ००, ००


Maharashtra Shikshak Bharti 2023- Important news for teachers and students of Maharashtra. In the coming new year, 30000 teachers and non-teaching staff will be recruited in the state. School Education Minister Deepak Kesarkar has announced that and the the Finance Ministry has approved the recruitment of 80% of the teachers and 50% of the posts will be filled immediately. Read More details are given below.

👉 शिक्षक भरती प्रक्रिया 17-02-2023 ते 28-02-2023 या दरम्यान आयोजित केली असून 5 मार्च 2023 पर्यंत निकाल येणार अस वेळापत्रक कोर्टाला पण दिल आहे.. विधानपरिषद लक्षवेधी प्रश्न बद्दल उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले (शुक्रवार)..

येत्या नव्या शैक्षणिक वर्षात राज्य सरकार तब्बल 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची आधार जोडी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची एकूण संख्या कळेल आणि त्यानंतरच 30 टक्के भरती केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल (गुरुवारी) विधानसभेत बोलताना म्हटलं आहे. 

Maharashtra Teachers Recruitment 2023

येत्या नव्या वर्षात राज्यात 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. अर्थ खात्यानं शिक्षकांच्या 80 टक्के भरतीला मंजुरी दिली असून त्यापैकी 50 टक्के पदं तातडीनं भरण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्याचसोबत, महाराष्ट्रातील कोणतीही शाळा बंद करणार नसून, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचा खुलासाही दीपक केसरकर यांनी केला आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भरती संदर्भात माहिती देताना म्हटले की, “50 टक्के शिक्षक भरती लवकरच केली जाणार आहे. 80 टक्के भरती करता आली असली, पण सध्या आधारकार्ड लिंकिंग सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची निश्चित संख्या ठरेल आणि त्यानंतरच 30 टक्के भरती होईल.” पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, “परवानगी मिळाली तर 100 टक्के भरती करण्याची तयारी शिक्षण विभागाची आहे. डिसेंबर 31 पर्यंत आधार लिंक करण्याचं काम होईल आणि त्यानंतर एक महिन्यानं सर्व कामांचा मेळ घेतला जाईल, पण भरती न थांबवता 50 टक्के भरती ही ताबडतोब केली जाईल, यात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती होईल.” अशी घोषणा केसरकरांनी यावेळी केली आहे. तसेच, नव्या वर्षात 30 हजार प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे.

20 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येणार नाही. तसा शासनाचाही विचार नसल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळे सरकार या शाळा बंद करणार, असा अनेकांचा समज झाला. मात्र, ज्या शाळेत एक विद्यार्थी असेल, त्याला त्या ठिकाणी  योग्य शैक्षणिक वातावरण मिळू शकेल का, हा मुद्दा आहे. त्यामुळे मुलांच्या हिताचा विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटलं. दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे मंत्री केसरकर यांनी म्हटलं.


Shikshak Bharti 2022- Latest updates regarding Maharashtra Shikshak Bharti 2022 is that 75000 teachers will be recruited in the state in the month of April. State school education minister Deepak Kesarkar made a public announcement that the stalled transfers will be done after that. Read More details are given below.

अलिबाग: राज्यात एक लाखापेक्षा जास्त शाळा आहेत. राज्यात शिक्षक कमी पडत आहेत. परिणामी, आंतरजिल्हा बदल्या करण्यात अडचणी येत आहेत. येत्या एप्रिल महिन्यात राज्यात ७५ हजार शिक्षकांची भरती केली जाईल. त्यानंतर रखडलेल्या बदल्या केल्या जातील, अशी जाहीर घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

Maharashtra Shikshak Bharti 2022

जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्ताने महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर बोलत होते. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आ. महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


Shikshak Bharti 2022: Latest updates regarding Maharashtra Shikshak Bharti 2022 is that As the teachers in the state are waiting for recruitment, the government has decided to speed up 50 percent recruitment, this is not just an announcement but the implementation has started. Read More details are given below.

 राज्यातील हजारो भावी शिक्षक नोकरभरतीच्या प्रतिक्षेत असल्याने 50 टक्के नोकरभरती त्वरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, ही नुसती घोषणा नसून अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेत राज्य देशात पहिल्या तीनमध्ये असले तरी यंदा महाराष्ट्र अव्वल असले पाहिजे, अशी अपेक्षाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांकडून व्यक्त केली. शिक्षकांनी केलेल्या मागण्यांपैकी अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी कास्ट्राईब संघटनेच्या नेत्यांची मुंबईत बैठक घेवून निर्णय घेवू, असे आश्वासनही मंत्री केसरकर यांनी दिले.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री केसरकर बोलत होते. महासैनिक दरबारमध्ये झालेल्या अधिवेशनात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यातील विविध जिल्हय़ातील मागासवर्गीय प्रवर्गातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने मंत्री केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मंत्री केसरकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून, प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण दिले जाईल. इंग्रजी भाषेच्या मागे न लागता, मातृभाषेतून शिक्षण घेवून विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी बुध्दी खर्च केली पाहिजे. विद्यार्थ्यांना व्होकेशनलचे प्रशिक्षण देवून शिक्षण घेत रोजगाराची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातून भारताकडून प्रत्येक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ सर्व जगाला पुरवण्याचा मानस आहे. शिक्षकांनी बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान आत्मसाथ करून, गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे. तसेच विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा पुढचा टप्पा जाहीर केला असून, अघोषीत शाळांना मुख्य प्रवाहत घेतले आहे. शंभर टक्के केंद्र प्रमुखांची पदे भरली जाणार हे निश्चित असले तरी 50 टक्के पदभरतीच्या सूचना तातडीने दिल्या आहेत. तसेच मागासवर्गीयांना बिंदू नामावलीनुसार पदोन्नती दिली जाईल. कॅशलेश मेडीक्लेम, शिक्षकांच्या बदल्यांचा अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना देण्याचा प्रयत्न करणार.

विद्यार्थ्यांना वह्य़ा पुरवणार

सरकारच्या वतीने जी पुस्तके दिली जातात, त्याबरोबर विद्यार्थ्यांना वहय़ाही पुरवल्या जाणार आहेत. तसेच सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा सरकारचा विचार असून, किती खर्च येतो ते पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थी हितच मुख्य सरकारचा उद्देश असल्याने शिष्यवृत्तीची रक्कम वाढवली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी सांगितले.

 मागासवर्गीय शिक्षकांवर अन्याय करणारांची चौकशी करा

कास्ट्राईब संघटनेने मागासवर्गीय शिक्षकांवर अधिकारी अन्याय करतात, अशी तक्रार मंत्री केसरकर यांच्याकडे केली. यावर मंत्री केसरकर यांनी शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना बोलावून संबंधीत अधिकाऱयांची चौकशी करण्याचे आदेश दिले. चुकीच्या पध्दतीने पदमान्यता दिल्या असतील तर त्याचीही चौकशी करणार असल्याचे सांगत, कोल्हापूर विभागातील अधिकाऱ्यांनी मागासवर्गीय शिक्षकांना चुकीची वागणूक दिल्यास करवाई करणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.


Shikshak Bharti 2022 – Latest updates regarding shikshak bharti 2022 is that A total of 31 thousand teacher posts are vacant in Zilla Parishad, Municipal Corporation, Cantonment, Nagar Parishad schools in the state. About 20 thousand of these vacancies are in Zilla Parishad schools. Read More details are given below.

राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या सरकारी शाळांमध्ये एकूण ३१ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील जवळपास २० हजार रिक्त पदे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असून, ही संख्या कशी भरली जाणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

राज्यात जिल्हा परिषद, महापालिका, कँटोन्मेंट, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारी शाळा चालवल्या जातात. राज्य सरकारचा शिक्षण विभाग आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातर्फे या शाळा चालवल्या जातात. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी, शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या हेतूने या शाळा चालवल्या जात आहेत. मात्र, या शाळांमध्ये शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नसून, सध्या राज्यामध्ये दोन लाख १४ हजार ११९ शिक्षक कार्यरत आहेत. ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या माहितीनुसार; तसेच २०१८-१९च्या पटसंख्येनुसार दोन लाख ४५ हजार ५९१ शिक्षक कार्यरत असणे गरजेचे आहे. यामुळे चार वर्षांपूर्वीच्या संचमान्यतेनुसारही राज्यात ३१ हजार ४७२ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या वर्षी विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकानुसार राज्यामध्ये संचमान्यता होऊ घातली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ काही हजारांमध्ये होणार असल्याने रिक्त पदांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. त्यातच आता शाळांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अशा वेळी शाळांमध्ये पुरेसे शिक्षकच उपलब्ध नसतील; तर शैक्षणिक धोरण कसे राबवणार, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यातील प्राथमिक शिक्षक संख्या

विभाग मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे

जिल्हा परिषद २१९४२८ १९९९७६ १९४५२

महापालिका १९९६० ८८६२ ११०९८

नगरपरिषद ६०३७ ५१३६ ९०१

कँटोन्मेंट १६६ १४५ २१

महापालिकेत ४५ टक्के पदे रिक्त

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये असलेल्या सरकारी शाळांमध्ये एकूण ४५ टक्के शिक्षकांची कमतरता असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. यामुळे राज्यातील पालिकेच्या शाळांचा गाडा निम्म्याच शिक्षकांकडून हाकला जात आहे. अशा वेळेला शिक्षणाची गुणवत्ता कशी टिकून राहणार, असा प्रश्न उपस्थित होत असून, ही पदे तातडीने भरण्याची मागणी केली जात आहे.

शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने रिक्त जागा भरणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा परिषद, महापालिकेच्या अनेक शाळा एका शिक्षकाच्या जोरावर सुरू आहेत. असे असेल तर शैक्षणिक गुणवत्ता कशी टिकेल. यामुळेच सरकारी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहेत.


Maharashtra Shikshak Bharti 2022- Latest updates regarding Shikshak Bharti 2022 is that The Nagpur Bench of the Bombay High Court has ordered the state government to conduct the Teachers Aptitude and Intelligence Test (TAIT) from February 17 to 28 next year and complete the teacher recruitment process thereafter. Read More details are given below.

शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणीचा मुहूर्त अखेर ठरला

पुढील वर्षी १७ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टिचर्स ॲप्टिट्युट ॲण्ड इन्टेलिजन्स टेस्ट – टीएआयटी) परीक्षा घ्या व त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. यासंदर्भात जितेंद्र सोनकुसरे यांच्यासह चार उमेदवारांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी १ ऑक्टोबर २०१८ रोजी शिक्षक पात्रता चाचणी (टीचर एलिजिबिलिटी टेस्ट – टीईटी) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परंतु, शिक्षण हक्क कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास पात्र होण्यासाठी टीएआयटी परीक्षाही उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.


Shikshak Bharti 2022: Latest updates regarding Shikshak Bharti 2022 is that Recruitment of teachers will be done after adjustment of additional teachers in the state. Candidates Read the complete details given below on this page regarding the Teachers Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.




राज्यात ७५ हजार पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे विविध विभागाप्रमाणेच शिक्षण विभागातही शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. परंतु राज्यात अनेक अतिरिक्त शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त जागांवर या शिक्षकांचे समायोजन आधी केली जाईल. त्यानंतरच शिक्षक भरती होऊ शकेल. यामुळे अतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळेल, शिवाय त्यातून वाचलेल्या पैशातून हुशार विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाढविता येईल. जास्तीत जास्त खर्च विद्यार्थ्यांवर करण्याला प्राधान्य देण्यात येईल,’ असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रम केसरकर यांच्या उपस्थित शुक्रवारी झाला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. गेल्या १६-१८ वर्षात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ झालेली नाही. शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्याबाबतही विचार केला जाईल, असे सुतोवाचही केसरकर यांनी केला. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाबाबत ते म्हणाले, ‘वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याआधी तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांची माहिती संकलित करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये सामावून घेतले जाईल, अशाप्रकारे क्लस्टर शाळा करण्यात येतील. मुलांना ‘स्कूल बस’चे आकर्षण असते. या मुलांनाही शाळेमध्ये जाण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही ‘स्कूल बस’मधून क्लस्टर शाळेत जाता येईल आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकले.

पवित्र पोर्टल बंद होणार नाही : शिक्षण मंत्र्यांची भूमिका

‘शाळा शिक्षण संस्था चालक चालवत असले तरीही शिक्षकांना १०० टक्के पगार सरकार देते. त्यामुळे विनाकारण शिक्षणाचा दर्जा कमी होईल, अशा मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत. अन्यथा संस्था चालकांनी ‘स्वयं अर्थसहाय्यित’ म्हणून घोषित करावे आणि स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावेत. शिक्षण संस्था चालकांनी अनेक वर्ष शिक्षणाची सेवा केली आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु केवळ आमची संघटना आहे, म्हणून आम्ही सांगू तसे सरकार वागेल, हे होणार नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे.’


Maharashtra Shikshak Bharti 2022: Latest updates regarding Maharashtra Teachers Recruitment 2022 is that Mega recruitment is going to be done in the education department in the state. Deepak Kesarkar said that mega recruitment of 5000 teachers in Konkan and more than 75000 teachers will be done in the state. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Shikshak Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

  1. मराठा समाजाला आरक्षण हे प्राधान्याने देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे  यांनी स्वतः तज्ज्ञाशी दिल्लीत जाऊन चर्चा केली आहे. त्यामुळे निश्चितपणे यातून मार्ग निघेन, अशी आमची खात्री आहे, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली. शिक्षण विभागात महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती केली जाणार असल्याचंही दीपक केसरकरांनी सांगितलं.
  2. कोकणात ५ हजार शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार असून अतिरिक्त शिक्षणाचे समायोजन करून राज्यात शिक्षण विभागात मेगा भरती केली जाणार आहे. तसेच ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती राज्यात केली जाणार असून याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं.

Maharashtra Shikshak Bharti 2022: Latest updates regarding Maharashtra Teachers Recruitment 2022 is that School Education Minister Deepak Kesarkar assured that 50 percent of the vacant posts will be filled. As per the decision of the State Government, 50% of the vacant posts of teachers will be filled. The adjustment process of the teachers will be completed immediately. The posts of non-teaching staff will be filled along with teacher recruitment. Candidates Read the complete details given below on this page regarding the Shikshak Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता लक्षात घेऊन, रिक्त पदांपैकी ५० टक्के शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे,’ असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिले. वर्गात शिक्षकांचे छायाचित्र लावण्याऐवजी शाळेतील परिचय फलकावर शिक्षकांचे छोट्या आकाराचे छायाचित्र लावण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्य मंडळात झाली. या बैठकीत केसरकर यांनी शिक्षण विभागातील विविध विभागांचा आढावा घेतला. या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, ‘राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे शिक्षकांच्या रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याला अचडण नाही. त्यामुळे ही पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. त्याच वेळी राज्यातील काही शाळांमध्ये दोन विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक कार्यरत आहे, तर काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यातून मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांच्या समायोजन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येईल. शिक्षक भरतीसोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहे.’

पाठ्यपुस्तकांमध्येच वह्या

  • शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी, पुढील वर्षीपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची जोड देण्यात येणार आहे, असा पुनरुच्चार शिक्षणमंत्री केसरकर यांनी केला. एका इयत्तेला तीन पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये धडा संपला की, काही कोरी पाने देण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांना या पानांचा उपयोग वहीसारखा करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेगळ्या वह्या आणण्याची गरज भासणार नाही. पुढील शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.
  • शालेय़ शिक्षण विभागाचा मंत्री झाल्यापासून, विभागातील घडामोडींची बारकाईने माहिती घेत आहे. त्यासाठी मला वेळ हवा आहे. एखाद्या विषयावर सविस्तर माहिती न घेता, विधाने करणे मला पटत नाही.
  • आगामी काळात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासोबतच, शालेय शिक्षणात कौशल्य विकासावर भर देण्यासाठी काम करणार आहे. काही दिवसांत शालेय शिक्षण विभागात शैक्षमिक गुणवत्ता वाढीसारख्या चांगल्या सुधारणा दिसतील अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

Maharashtra Shikshak Bharti 2022 New update : Since the Teacher recruitment process has been closed for the last 10-12 years, 31 thousand 572 posts of teachers are vacant in government primary and higher primary schools.. Also, there are about 55,000 to 60,000 teacher vacancies in the schools of Nagpur state. Read More details about Maharashtra Shikshak Bharti 2022 are given below.

राज्यातील शाळांमध्ये तब्बल ५५ ते ६० हजार शिक्षकांची पदं रिक्त

  • राज्यातील शाळांमध्ये तब्बल ५५ ते ६० हजार शिक्षकांची पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम करत असल्याचा आरोप भाजप समर्थीत आमदार नागो गाणार यांनी केला आहे.
  • गेल्या १०-१२ वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानीत खाजगी शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत. सरकारी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत ३१ हजार ५७२ शिक्षकांची पदं रिक्त असून अनुदानीत खाजगी शाळांमध्ये २५ हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत.
  • शिक्षक नसतील तर मग सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार? असा प्रश्न भाजप समर्थीत आमदार नागो गाणार यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी आणि सध्याच्या सरकारचंही शिक्षणाच्या बाबतीत धोरणं सारखचं आहे, असं म्हणत गाणार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
  • तिजोरीतील पैसा वाचवण्यासाठी आणि कायम विना अनुदानित शाळांना फायदा पोहचविण्यासाठी शिक्षकांची पदं रिक्त ठेवली जात, असल्याचा आरोपही गाणार यांनी केलाय. हे सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळखंडोबा करतंय, मात्र आम्ही शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत राहणार असल्याचं गाणार यांनी सांगितलं.

Maharashtra Shikshak Bharti 2022:  Latest updates regarding Shikshak Bharti 2022 is that there is a total of 18 Thousand 49 vacancies are vacant in State. In the state, 16 thousand 748 posts of teachers are vacant in Marathi schools while 13 thousand 01 posts are vacant in Urdu schools. As primary teachers in Marathi and Urdu schools have not been recruited for eleven years, as many as 18 thousand 49 posts of teachers are still vacant in the state. Read More details about Shikshak Bharti 2022/Shikshak Recruitment 2022 are given below.

पुणे : तब्बल अकरा वर्षांपासून मराठी आणि उर्दू शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही. यामुळे सद्यःस्थितीत या दोन्ही माध्यमांच्या शाळांमधील मिळून शिक्षकांच्या १८ हजार ४९ जागा अद्याप रिक्तच आहेत. एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांमधील १६ हजार ७४८ जागांचा समावेश आहे. सन २०१९ मध्ये शिक्षक भरतीवरील बंदी उठली आहे. परंतु बंदी उठून चार वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होत नसल्याचे दिसून आले आहे.

 Maharshtra Shikshak Recruitment 2023

  • प्राथमिक शिक्षकांची राज्यात सर्वाधिक १ हजार १९६ जागा या कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात रिक्त असून, सर्वात कमी म्हणजेच केवळ ८७ जागा या मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. या वृत्ताला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही दुजोरा दिला आहे.
  • राज्यात सन २०११ पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ही बंदी २०१९ मध्ये उठविण्यात आली. एकीकडे देशात महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक उंचावण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
  • शिक्षकांच्या जागा भरल्याच जाणार नसतील तर, राज्याची शैक्षणिक प्रगती कशी साधणार, असा प्रश्न प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अघ्यक्ष महेश ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यामागे
  • एक शिक्षक असे अनिवार्य आहे. याच नियमाच्या आधारानुसार सध्या १८ हजार ४६ जागा रिक्त आहेत.
  • सन २०११ मध्ये काही खासगी शैक्षणिक संस्थांनी बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षक भरती केल्याचा गैरप्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षक भरतीवरच बंदी घालण्यात आली होती.

 Shikshak Bharti 2022- Vacancy Details for Urdu School

Sr. No District  No. of Vacancy 
1. Ahmednagar  02
2. Akola  121
3 Amravati   04
4 Aurangabad  96
5 Beed  75
6 Bhandara
7 Buldhana 76
8 Chandrapur
9 Dhule  77
10 Gadchiroli 
11 Gondia 
12 Hingoli 
13 Jalgaon  196
14 Jalna  31
15 Kolhapur  18
16 Nagpur  01
17 Nanded  56
18 Nandurbar 32
19 Nashik  03
20. Palghar  57
21 Yavatmal  68
22  Parbhani  45
23  Pune  06
24 Raigad  114
25 Ratnagiri  84
26 Sangli  35
27 Satara  05
28  Sindhudurg  26
29 Solapur 
30 Thane  36
31 Wardha  11
32 Washim  50
  Total  1301

Maharashta Teachers Bharti 2022- Vacancy Details for Marathi School

Sr. No District  No. of Vacancy 
1. Ahmednagar  347
2. Akola  288
3 Amravati   320
4 Aurangabad  569
5 Beed  441
6 Bhandara 308
7 Buldhana 173
8 Chandrapur 204
9 Dhule  321
10 Gadchiroli  265
11 Gondia  291
12 Hingoli  87
13 Jalgaon  363
14 Jalna  203
15 Kolhapur  972
16 Nagpur  769
17 Nanded  732
18 Nandurbar 345
19 Nashik  531
20. Palghar  1916
21 Yavatmal  1307
22  Parbhani  346
23  Pune  161
24 Raigad  1051
25 Ratnagiri  848
26 Sangli  666
27 Satara  1023
28  Sindhudurg  576
29 Solapur  484
30 Thane  541
31 Wardha  204
32 Washim  123
  Total  16, 748

Pavitra Teachers Recruitment 2022

  • दरम्यान, राज्य सरकारने २०१९ मध्ये तत्कालीन महायुती सरकारने ‘पवित्र पोर्टल`च्या माध्यमातून शिक्षक भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता.
  • यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली होती. त्यावेळी सुमारे पावणे दोन लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.
  • परंतु खासगी अनुदानित संस्थांवरील नियुक्त्यांची प्रक्रिया अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नसल्याचेही उघडकीस आले आहे.
  • राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांतील १६ हजार ७४८ आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमधील १ हजार ३०१ जागांचा समावेश आहे.
  • प्रत्यक्षात कन्नड, बंगाली, तेलगू, गुजराती अशा भाषांच्या शिक्षकांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामध्ये नगरपालिका, महापालिका, खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा आदी शाळांमधील रिक्त जागांचा समावेश नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Shikshak Bharti 2022 @ https://mahateacherrecruitment.org.in Latest updates regarding Shikshak Bharti 2022 is that According to the report of the central government, as many as 18 thousand 204 teacher posts are vacant in the government schools of the state. As large number of posts are vacant, it is affecting the education of lakhs of students. Read more update regarding Shikshak Bharti 2022/ Teachers Recruitment 2022 are given below.

  1. Shikshak Bharti -शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षकांची १७ हजार ५४३ पदे रिक्त  
  2. शिक्षक भरतीसाठी आणखी एक संधी; पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय

राज्यात तब्बल 18 हजार शिक्षकांची पदे रिक्त

राज्यातील सरकारी शाळांमध्ये तब्बल १८ हजार २०४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे केंद्रीय शिक्षण मंडळाच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या २०२२-२३ च्या अहवालातून समोर आले आहे. ही रिक्त पदे भरण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने लाखो विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणे कठीण झाले असून यासाठी सरकारने शिक्षकांची पदे भरण्यासाठीची कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील कार्यरत स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींकडून केली जात आहे.

ZP Teacher Bharti –  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १८ हजारांवर पदे रिक्त

Maharashtra Shikshak Bharti 2022

  • केंद्र सरकारच्या अहवालातून १८ हजार २०४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे दाखवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात चार वर्षांपूर्वी कॅगने ३२ हजार पदे रिक्त असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या रिक्त जागांचा आकडा सुमारे ३० हजारांच्या दरम्यान असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • राज्यात आजमितीला सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित, विनाअनुदानित आदींकडून चालविण्यात शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये सात लाख ८३ हजार ८४७ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमध्ये एकूण दोन कोटी २१ लाख ७४ हजार ६२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
  • सरकारीसह सर्वच शाळांमध्ये शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार प्रति ३० विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असणे आवश्यक आहे, मात्र उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिकच्या शाळांमध्ये अनुक्रमे ३१.४९ आणि ३६.९६ प्रतिविद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षक उपलब्ध आहेत.
  • त्यामुळे पाच लाख ४० हजार विद्यार्थी शिक्षकांविना शिक्षण घेत असून ही गंभीर बाब असल्याचे ‘सिस्कॉम’चे अध्यक्ष व शिक्षण तज्ज्ञ राजेंद्र धारणकर यांनी म्हटले आहे.

राज्यातील शाळांमधील विद्यार्थी संख्या

(एकूण शाळा १ लाख १० हजार २२९)

वर्ग- विद्यार्थ्यांची संख्या

  • पहिली १८,९९,४७०
  • दुसरी १९,७७,२१३
  • तिसरी १९,७७,२१३
  • चौथी २०,०५,५३६
  • पाचवी १९,९८,९६६
  • सहावी १९,७४,०२४
  • सातवी १९,५०,८२८
  • आठवी १९,२३,१८२
  • नववी १९,०८,९२६
  • दहावी १७,९६,०३०
  • अकरावी १३,५४,३८३
  • बारावी १४,२१,६९४
    • एकूण २,२१,७४,६२५ 

 सध्या कार्यरत Teacher शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रकि‘या सुरू करण्यात आली असून त्यासाठी रिक्त पदांची बिंदुनामावली (रोस्टर) जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिप शाळांमधील रिक्त पदसं‘या 18 हजारांवर आहे. बिंदुनामावलीनुसार मराठी माध्यमाची 16,748 आणि उर्दू माध्यमाची 1301 पदे रिक्त आहेत. नगर पालिका, महापालिका, खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा येथील रिक्त पदांचा कानोसा घेतल्यास 50 हजारांवर शिक्षकांचा राज्यात तुटवडा आहे. राज्यात लाखो बेरोजगार उमेदवार रिकामे फिरत आहेत. काही जण रोजमजुरी करीत आहेत. तर दुसरीकडे शाळेतील विद्यार्थी शिक्षकाविना तगमगत आहेत. शासन मात्र जिल्हा परिषदेतील Teacher शिक्षकांची भरती प्रकि‘या पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे, असे अ‍ॅड. प्रमोद घोडाम यांनी म्हटले आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2022- Vacancy Details

Sr. No District  No. of Vacancy 
1. Ahmednagar  347
2. Akola  288
3 Amravati   320
4 Aurangabad  569
5 Beed  441
6 Bhandara 308
7 Buldhana 173
8 Chandrapur 204
9 Dhule  321
10 Gadchiroli  265
11 Gondia  291
12 Hingoli  87
13 Jalgaon  363
14 Jalna  203
15 Kolhapur  972
16 Nagpur  769
17 Nanded  732
18 Nandurbar 345
19 Nashik  531
20. Palghar  1916
21 Yavatmal  1307
22  Parbhani  346
23  Pune  161
24 Raigad  1051
25 Ratnagiri  848
26 Sangli  666
27 Satara  1023
28  Sindhudurg  576
29 Solapur  484
30 Thane  541
31 Wardha  204
32 Washim  123
  Total  16, 748

Shikshak Bharti 2022: Latest updates regarding Shikshak Bharti 2022 is that There are 37 thousand teacher vacancies in the state. Recruitment through MPSC will be time consuming. Therefore, the education corporation  demanded in a press conference on Sunday to give a chance to the registered candidates on the holy portal to fill the posts immediately. Read more update regarding Shikshak Bharti 2022/ Teachers Recruitment 2022 are given below.

राज्यात तब्बल ३७ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त

मागील पाच वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्याने तब्बल ३७ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शाळेत शिकवायला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षक कसे देणार? त्यामुळे राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात. तसेच पवित्र पोर्टलची अंमलबजावणी पूर्ण झालेली नसताना शिक्षक भरती एमपीएससीच्या माध्यमातून करण्याचा घाट कशासाठी? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे सरकार्यवाह आ. विजय गव्हाणे यांनी रविवारी (ता.२४) आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

Shikshak Recruitment 2022

राज्यात २३ जून २०१७ पासून शिक्षक भरती पवित्र पोर्टल प्रणाली सुरू करण्यात आले. त्याची जाहिरात ऑक्टोबर २०१७ मध्ये काढून डिसेंबर २०१७ मध्ये पहिली परीक्षा झाली. शिक्षक निवडीसाठी ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षेसाठी राज्यातून १ लाख १७ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातून २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत फक्त ८ हजार जागा भरण्यात आल्या.

Shikshak Bharti 2022

तेव्हापासून अद्याप शिक्षक भरती झाली नाही. राज्यातील अनेक डीएड, बीएडधारक शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. शासनाने शिक्षक भरतीबाबत तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा शिक्षण संस्था महामंडळ रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा महामंडळाचे वाल्मीक सुरासे, एस.पी. जवळकर, मनोज पाटील, मिलिंद पाटील यांनी दिला.


Shikshak Bharti 2022 Updates @ https://mahateacherrecruitment.org.in/: Important News regarding Shikshak Bharti 2022 is that  the facility to change the self certificate was given from September 24, 2021. However, the self certificates of the candidates have not been updated. Therefore, now all the candidates who have passed the Teacher Aptitude and Intelligence Test in 2017 and registered on the website have been given a deadline of 17th July 2022 to change their certificates. Candidates are required to complete a new self-certificate in order to participate in the recruitment process for posts in 196 educational institutions under the Teacher Recruitment Process in the State. Eligible candidates were interviewed and recommended for teaching skills last year through the website for 2,062 vacancies of 561 managers selected for recruitment with interview.

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत १९६ शिक्षण संस्थांमधील जागांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना स्व प्रमाणपत्र नव्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांचा या पदभरतीसाठी विचार केला जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाकडून पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय आणि खासगी अनुदानित संस्थांमध्ये मुलाखतीसह अशा दोन टप्प्यांत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या ५६१ व्यवस्थापनांच्या २ हजार ६२ रिक्त जागांसाठी संकेतस्थळामार्फत गेल्यावर्षी पात्र उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात आली. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी जागा होत्या, पण खुल्या प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा १९६ शाळांच्या व्यवस्थापनांसाठी नव्याने प्राधान्यक्रम घेऊन पदभरतीची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

स्व प्रमाणपत्रात बदल करण्याची सुविधा २४ सप्टेंबर २०२१ पासून देण्यात आली होती, मात्र… –

काही उमेदवारांकडून गैरसमजुतीने किंवा चुकीने संकेतस्थळावर स्व प्रमाणपत्रात चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरलेली असल्याने आणि या माहितीमध्ये बदल करण्याबाबत उमेदवारांकडून गेल्या दोन वर्षांपासून विनंती करण्यात येत असल्याने, संबंधित उमेदवारांना स्व प्रमाणपत्रात बदल करण्याची सुविधा २४ सप्टेंबर २०२१ पासून देण्यात आली होती. मात्र उमेदवारांचे स्व प्रमाणपत्र अद्ययावत झालेले नाहीत. त्यामुळे आता २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झालेल्या, संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या सर्वच उमेदवारांना प्रमाणपत्रात बदल करण्यासाठी १७ जुलैची मुदत देण्यात आली आहे.

ही मुदत संपल्यावर १९६ व्यवस्थापनांतील रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम घेऊन गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल, शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. अधिक माहिती https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे

प्रमाणपत्रात बदल करण्यासाठी येथे क्लिक करा 

Mismatch in TET notice for Candidate

Candidates Instructions 


As per the Minister of State for School Education Bachchu Kadu said that the Shikshak Bharti 2022 in Maharashtra will be held soon. Due to the Corona School were closed for more than 2 years. Now that the school will start regular this year, there is a need to recruit teachers. Read the more details given below and keep visit on our website www.govnokri.in for more further details..

महत्वाचे- हजारो कलाशिक्षकांची पदे रिक्त

शिक्षण विभागातील रखडलेल्या भरत्या लवकरात लवकर घेऊ असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू त्यांनी दिलं आहे. एवढंच नाहीतर, शैक्षणिक विषमतेबाबत बोलताना शैक्षणिक विषमता अत्यंत घातक असून ती देशाला पोकळ करु शकते, असं बच्चू कडू म्हणाले. कोरोना संकटात शिक्षणात अधोगती आली. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ शाळा बंद होत्या. मात्र तरीदेखील केंद्रीय शिक्षण खात्यानं 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत आजही अव्वल असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

Shikshak Bharti 2022- As per the news, Thousands of vacancies for teachers in the state are currently vacant, while the government has not recruited teachers for nearly ten years. As a result, the number of students seeking admission in D.Ed courses has decreased.

शिक्षण विभागातील रखडलेल्या भरत्या लवकरात लवकर सुरु होणार

Updated on 23.05.2022- गेल्या काही वर्षांपासून भरती प्रक्रिया, शिक्षणसेवकांना मिळणारा अल्पसा प्रतिसाद या कारणांमुळे, तसेच मिळणारे तुटपुंजे मानधन आणि नोकरीच्या मर्यादित संधी यांमुळे विद्यार्थी डीएड अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.डीएड अभ्यासक्रमाला मिळणाऱ्या अल्पप्रतिसादामुळे राज्यातील शिक्षकांच्या हजारो जागा सध्या रिक्त आहेत, तर दुसरीकडे सुमारे दहा वर्षांपासून शासनाने शिक्षक भरती केली नाही. त्यामुळे डी.एड अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यानाच्या संख्येत घट झाली आहे.

Shikshak Bharti 2022

शिक्षण सेवक म्हणून नोकरी स्वीकारल्यानंतर त्यांना कामगारांपेक्षाही कमी वेतनावर काम करावे लगत असल्याचे वास्तव अनेक शिक्षण सेवक मांडताना दिसत आहेत. शासनाने शिक्षण सेवक म्हणून तटपुंज्या मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे या क्षेत्राकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली.


Shikshak Bharti 2022- As per the news, Teacher recruitment in the state has been cleared and 1,293 posts will be filled soon. The question of increasing the number of professors in junior colleges and higher secondary schools in the state has been resolved. A total of 1,293 posts of these teachers will be filled. Read More details regarding Shikshak Bharti 2022.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील एक हजार २९३ वाढीव पदांपैकी एक हजार २८ पदांची माहिती मंत्रालयात सादर केलेली असून उर्वरित २६५ पदांची माहिती देखील दोन दिवसांत मंत्रालयात सादर केली जाणार आहे, असे आश्वासन राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांतील प्राध्यापकांच्या वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागणे निश्चित झाले आहे.

रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी लवकरच अभियोग्यता परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संचालकांनी सांगितले. शिक्षक मान्यता, शालार्थ आयडी, अनुदानित संस्थेत शिक्षकांना परिविक्षाधीन आणि नियमित वेतन श्रेणीतील मान्यता एकाच वेळी देण्यात यावी, वेतन राष्ट्रियकृत बँकेमार्फत अदा करण्यात यावे, सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, पीएफ, डीसीपीएस; एनपीएस पावत्या नियमितपणे मिळाव्यात, थकित देयके, अर्धवेळ शिक्षकांना शिक्षण सेवक पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ पद पायाभूतमध्ये जाते, अशा वेळी त्यांचे अर्धवेळ वेतन पद मंजुरीपर्यंत खंडित करू नये, आदी मागण्या यावेळी करण्यता आल्या. यापैकी शासन स्तरावर नसलेल्या मागण्यांवर राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालकांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी संचालकांनी दिले.

सेवानिवृत्त शिक्षकांची संपकालीन ४२ दिवसाची रजा त्यांचे खात्यावर जमा करणे, विषय गट योजना पूर्ववत ठेवणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे, संच मान्यता २०१८-१९ प्रमाणे या वर्षी देखील शिक्षक संख्या निश्चित करणे, माध्यमिक संलग्न कनिष्ठ महाविद्यालयीन तुकडीतील विद्यार्थी संख्या ६० व वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न मध्ये ८० असावी, शिक्षकाचा कार्यभार शून्य झाल्याशिवाय त्यांना अतिरिक्त घोषित करू नये आदी मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.


Shikshak Bharti 2022– There are 5,000 vacancies for junior college teachers in the state. The Maharashtra State Junior College Teachers Federation has demanded that the state government should immediately fill the vacancies of teachers and complete the recruitment process during the summer vacation so that teachers can be made available in colleges in the coming academic year. Read More details regarding Shikshak Bharti 2022 are given below.

राज्यात शिक्षकांच्या पाच हजार जागा रिक्त; लवकरच होणार भरती

Professor Bharti – राज्यात प्राध्यापक भरती केव्हा होणार ? जाणून घ्या

उच्च माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक अतिरिक्त नसतानाही गेली दहा वर्षे सातत्याने भरतीसाठी विलंब केला जात आहे. परिणामी राज्यात पाच हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. राज्य सरकारने शिक्षकांची ही रिक्त पदे त्वरित भरावीत, ही शिक्षक भरती प्रक्रिया उन्हाळ्याच्या सुटीत पूर्ण करावी, जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांमध्ये शिक्षक उपलब्ध होऊ शकतील, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे.

राज्यात गेली १० वर्षे शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे आदेश देऊन शिक्षकांची भरती प्रलंबित राहत आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात काही शिक्षक अतिरिक्त असले तरी उच्च माध्यमिक शिक्षण विभागात मात्र पाच हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शासनाने या जागांवर शिक्षक भरण्यासाठी परवानगी नाकारल्यामुळे शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देत आहेत. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन करावे लागल्यामुळे शिक्षकांची कमतरता प्रकर्षाने जाणवली नाही, परंतु गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षक नसल्यामुळे वर्ग रिकामे असल्याचे महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

प्रा. आंधळकर म्हणाले,‘‘बोर्डाचे पेपर तपासणीसाठी शिक्षक पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने शिक्षकांना जास्त उत्तरपत्रिका तपासाव्या लागल्या आहेत. दरम्यान, शासनाने ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षकांची भरती करण्याचे कार्य सुरू केले होते, परंतु ही प्रक्रिया देखील थांबली. त्यामुळे आता राज्य सरकारने शिक्षकांच्या किती जागा रिक्त आहेत, याची त्वरित माहिती घ्यावी आणि उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी.’’ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित राबविण्याच्या मागणीचे निवेदन महासंघातर्फे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.


Maharashtra Shikshak Bharti 2022- The state government (Maharashtra Govt.) Has taken an important decision regarding teacher recruitment. School Education Minister Varsha Gaikwad has informed that teachers will be recruited where there is shortage of teachers and adjustment will be made where there is excess. This recruitment process will be started within this month.

शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा!! जाणून घ्या

मागील काही दिवसांपासून शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा सुरु आहेत. यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकवेळा टोलेबाजीही झाली आहे. मात्र आता शिक्षक भरती संदर्भात राज्य सरकारने (Maharashtra Govt.) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिथे शिक्षक कमी आहेत तिथे शिक्षकभरती केली जाणार असून अतिरिक्त असतील तिथे त्यांचं समायोजन केलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. आज सभागृहात त्यांनी ही घोषणा केली आहे. याच महिन्याभरात या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shikshak Bharti- राज्यात तब्बल 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच

अनेक दिवसांपासून हा शिक्षक भरती रखडली असल्याने अनेकवेळा शिक्षकांकडून आंदोलने झाली. संबंधित अनेक संघटनांनी मोर्चे काढले मात्र तरीही राज्यसरकारला जाग येत नसल्याने विरोधकांनी राज्यसरकारला धारेवर धरलं होतं. मात्र आता या घोषणेमुळे शिक्षकांत पुन्हा एकदा उत्साहाते वातावरण पसरले आहे


या तालुक्यात शिक्षकांच्या रिक्त जागा लवकरच भरणार!!

In Koregaon (Barshi) Teacher vacancies to be filled soon. In Barshi taluka including Koregaon, the movement to fill the vacancies of teachers in 18 Zilla Parishad schools has gained momentum. Eighteen districts in the taluka including Koregaon. Immediate action will be taken to fill the vacancies of teachers in the school and the inconvenience will be removed by filling the vacancies. Teacher recruitment will be done soon in Koregaon. Read More details as given below.

कोरेगाव (ता, बार्शी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकाच खोलीत चार इयत्तांचे वर्ग चालवण्याची जबाबदारी एकाच शिक्षकावर आहे. कोरेगावसह बार्शी तालुक्यात 18 जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याबाबतच्या हालचालींना गती आली आहे. मात्र. तातडीने शिक्षक न दिल्यास कोरेगाव जि. प शाळेला 4 मार्च रोजी कुलूप ठोकण्याच्या निर्णयावर ग्रामपंचायत व ग्रामस्थ ठाम आहेत.

Shikshak Bharti- राज्यात तब्बल 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच

Shikshak Bharti 2022

कोरेगावसह तालुक्यातील अठरा जि. प शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करून जागा भरून गैरसोय दूर केली जाईल. कोरेगाव येथेही लवकरच शिक्षक येईल.”


Shikshan Vibhag Bharti 2022

The recruitment process for professor vacancies was stalled during the Corona period. Higher and Technical Education Minister Uday Samant has assured that the recruitment process will start soon.

नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने 21 जून 2021 पासून विविध मागण्यांच्यासंदर्भात पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार होते. उच्चस्तरीय समितीच्यावतीने एकून 4 हजार 74 प्राध्यापक भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 674 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पूर्ण आली मात्र 3 हजार 64 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया कोरोनाच्या काळात थांबलेली होती. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

शिक्षणमंत्री सामंत म्हणाले, ”प्राध्यापक भरती प्रकियेची नस्तीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाही पूर्ण करुन सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आलेली आहे.

तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मागणीच्या अनुषंगाने 48 मिनीटांची तासिका याप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सीएचबी संदर्भात निर्णय घेण्यासाठी संचालक धनराज माने यांच्या अध्यक्षेतेखाली समिती गठित करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

महाराष्ट् राज्य ग्रंथपाल महासंघाच्यावतीने अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये तसेच विद्यापिठातील ग्रंथपाल भरतीसंदर्भात केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत 121 ग्रंथपाल भरती तसेच विद्यापिठातील शिक्षकीय 659 भरती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे महाराष्ट् राज्य ग्रंथपाल महासंघाच्यावतीने स्वागत करत 28 जूनला होणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.



Teachers Recruitment 2022

Shikshak Bharti 2022: There are more than 1800 vacancies for teachers in Pesa area of the district and more than 350 tribal youth who have passed the Teacher Eligibility Test are waiting for jobs.Palghar Zilla Parishad Chief Executive Officer Siddaram Salimath has requested the seniors in a letter to hold a meeting at the senior level to implement the recruitment process in the PESA area.

  1. एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 3479 शिक्षक पदाची भरती
  2. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती पुढील महिन्यात होणार !

जिल्ह्यात पेसा भागातील शिक्षकांच्या १८०० हून अधिक रिक्त

  1. सन २०१० नंतर शिक्षक भरती झाली नसल्याने अनेक डी.एड, बी.एड उत्तीर्ण पदवीधरांना शिक्षक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. जिल्ह्यात पेसा भागातील शिक्षकांच्या १८०० हून अधिक रिक्त जागा असून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले ३५० पेक्षा अधिक  आदिवासी तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
  2. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी ३६३ रिक्त जागांपैकी ३१८ पेसा क्षेत्रातील जागांमधील १४० उमेदवारांची निवड करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये १८०० पेक्षा अधिक पेसा क्षेत्रातील जागा रिक्त असल्याची माहिती  प्रशासनाने दिली आहे.
  3. पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया राबवण्यासाठी वरिष्ठस्तरावर बैठकीचे आयोजन करावी यासाठी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी वरिष्ठांना पत्राद्वारे विनंती केली आहे. हा निर्णय प्रलंबित राहिल्याने जिल्ह्यतील तसेच इतर आदिवासी जिल्ह्यतील हजारो आदिवासी तरुण शासकीय नोकरीपासून वंचित राहिले आहेत

शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवर होणार भरती

Shiksha Bharti 2022: There are vacancies for teachers and staff of subsidized colleges in the state. Higher and Technical Education Minister Uday Sammat has clarified that 100 per cent posts of teachers and staff in the college will be considered in phases

  1. पुणे – राज्यातील वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आदेश उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी सर्व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत.
  2. राज्यातील अनुदानित महाविद्यालयील शिक्षक, कर्मचाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. यापूर्वी 40 टक्‍के रिक्‍त पदे भरण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्यातील सर्व पदेही भरलेली नाहीत. त्यातच करोनामुळे शासनाने काटकसरीचे धोरण अवलंबिले असून नवीन पद भरतीला निर्बंध घातले असून याबाबत वित्त विभागाने 4 मे 2020 रोजी आदेशही काढले आहेत.
  3. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या रिक्‍त पदांची भरती त्वरीत सुरू करण्याची मागणी होत आहे. विविध संघटनांकडून आंदोलनाचे इशारेही देण्यात आले आहेत. दरम्यान, कोणत्या महाविद्यालयात किती पदे रिक्‍त आहेत याचा आढावा घेण्यासाठी माहितीची जमवाजमव सुरू झाली आहे. 1 ऑक्‍टोबर ही तारीख निश्‍चित करून 2018, 2019, 2020 या वर्षातील विद्यार्थी संख्येच्या आधारावर अनुज्ञेय, कार्यरत व रिक्‍त पदांची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे.
    उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांची 100 टक्‍के पदे टप्प्पाटप्प्याने भरण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रिक्‍त पदांची माहिती जमा करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
  4. 25 फेब्रुवारीपर्यंत माहिती सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. विभागीय सहसंचालकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व महाविद्यालयांनी माहिती जमा झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून उच्च शिक्षण संचालक कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करावा लागणार आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2022

Shikshak Bharti 2022: The posts of professors and Principals in the state are vacant. Hundreds of principal posts are vacant. The government had given permission to fill some of the posts. However, after the corona outbreak, the finance department on May 4 imposed restrictions on recruitment in the state 260 colleges in the state will finally get full-time principals and the government has approved the recruitment of principals.

राज्यातील २६० महाविद्यालयांना अखेर पूर्णवेळ प्राचार्य मिळणार असून शासनाने प्राचार्याची भरती करण्यास मंजुरी दिली आहे.

राज्यातील प्राध्यापक आणि प्रचार्याची पदे रिक्त आहेत. प्राचार्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यापैकी काही पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती. मात्र करोना संसर्गानंतर वित्त विभागाने ४ मे रोजी राज्यातील पद भरतीवर निर्बंध आणले. मात्र, प्राचार्य नसल्यामुळे महाविद्यालयांच्या रोजच्या कामकाजावर परिणाम होत होता. अनेक महाविद्यालयांचे नॅकचे मूल्यांकनही रखडले होते.

विविध संघटनांनी प्राचार्याची पदे भरण्याची मागणी केली होती. अखेर शासनाने प्राचार्याची २६० पदे भरण्यास वित्त विभागाने ४ मेच्या निर्बंधातून सूट दिली आहे. त्यामुळे या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.


शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत; हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न सुटणार?

गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी द्यावी, या मागणीच्या पूर्ततेसाठी अर्थ खात्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्याची माहिती डी.एड., बी.एड. स्टुडन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्यासाठी मे महिन्यात सरकारने पदभरतीवर बंदी घालण्यात आली. मात्र, दहा-बारा वर्षापासून रखडलेली शिक्षक भरती तीन वर्षांपूर्वी सुरू झाली आणि कोरोनामुळे त्यालाही स्थगिती देण्यात आली. परिणामी शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भरती प्रक्रियेला वित्त विभागाने विशेष परवानगी द्यावी, या मागणीच्या पुर्ततेसाठी डी.एड., बी.एड. स्टुडन्ट असोसिएशनमार्फत औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय अन्नत्याग पायी दिंडी आंदोलन सुरू केले होते.

ही दिंडी ठाण्यामध्ये दाखल झाल्यावर शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आंदोलनकर्त्याची दखल घेऊन संघटनेच्या संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर शालेय शिक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळाला आमंत्रित करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सावंत, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर, राज्य उपाध्यक्ष संदीप कांबळे, जीवन काकडे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत ५० टक्के मागासवर्गीय पदे भरतीबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच कार्यवाही करणार असल्याची माहिती देखील यावेळी दिल्याचे मगर यांनी सांगितले.


कोरोना संकटात ही कंपनी 20 हजार महिलांना देणार रोजगार, दीड लाखांपर्यंत पगार

कोरोना संकटाच्या काळात पदवीधर आणि पदव्युत्तर महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. एडटेक स्टार्टअप व्हाइटहॅट जुनियर (WhiteHat Jr) ने म्हटले आहे की, ते आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील महिला शिक्षकांची संख्या वाढवित आहेत. कंपनी प्लॅटफॉर्मवर दररोज 220 शिक्षकांना जोडत आहे. आतापर्यंत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7,000 पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहे. वर्षाच्या अखेरीस 20,000 शिक्षकांची भरती करण्याची त्यांची योजना आहे, अर्थात यावर्षी आणखी 13,000 शिक्षकांची भरती करण्याची कंपनीचा मानस आहे 

अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढतीच

व्हाइटहॅट जुनियरला अलीकडेच बीजू(Byju’s) यांनी विकत घेतले होते. व्हाइटहॅट ज्युनियर म्हणाले की, त्यांचे भारत (India), अमेरिका (US), कॅनडा (Canada), ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, त्याच्या प्लॅटफॉर्मवर शिक्षकांची संख्या वाढत आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे डिजिटल शिक्षण आणि शिक्षणाच्या पद्धतींमध्ये नवीन प्रयोग करण्यात येत आहेत

पालक ऑनलाइन शिकण्यास पूर्णपणे पाठिंबा देत आहेत

व्हाइटहॅट ज्युनियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण बजाज म्हणाले की, पालकांनीही ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. मुलांच्या शिक्षणाच्या या नवीन दृष्टिकोनास पालक पूर्णपणे पाठिंबा देत आहेत. सध्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित 84 टक्के शिक्षकांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. ते घरी मुलांना शिकवत आहेत आणि दरमहा सरासरी 50,000 ते 1.5 लाख रुपये कमवत आहेत. बहुतेक शिक्षकांकडे पदव्युत्तर पदवी आहेत. या कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली होती.

सोर्स: लोकमत

शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार पवित्र संके तस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती करण्यासाठी प्राधान्यक्रम भरून निश्चित करण्याची संधी दिली असून, येत्या ३१ ऑगस्टपर्यंत संबंधित उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम नोंदवता येणार असल्याचे पवित्र पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले.

पवित्र संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार, ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने काही उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता आलेले नाहीत. मात्र आता खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण श्रेणी आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता येणार आहेत. अकरावी, बारावीत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत. परंतु असे उमेदवारांना पदव्युतर पदवीला किमान द्वितीय श्रेणी असेल आणि त्याची नोंद पवित्र संकेतस्थळावर केली असल्यास त्यांना प्राधान्यक्रम देता येणार आहेत. नववी, दहावी या गटातील माध्यमिक पदासाठी पदवीस्तरावर उत्तीर्ण; पण ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने प्राधान्यक्रम देता न आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देता येतील. वयाच्या नियमामुळे प्राधान्यक्रम देऊ न शकलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम नोंद केल्यानंतर भरता येतील. उमेदवारांना समांतर आरक्षणाची नोंद एकदाच करता येणार आहे. जून २०१९ पूर्वी मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित के लेल्या उमेदवारांनी नव्याने प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही. त्यांना लॉगिन उपलब्ध होणार नसल्याची सूचना पवित्र संके तस्थळावर देण्यात आली आहे.

दरम्यान पवित्र संकेतस्थळावर प्रशासकीय सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. आता तरी शिक्षण विभागाने तातडीने भरती प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

पवित्र प्रणालीमार्फत सुरू झालेली शिक्षक भरती कोरोनामुळे अडखळली होती. मात्र आता पुन्हा ही प्रक्रिया ‘अनलॉक’ झाली असून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या १५६० जागा आता रिक्त आहेत. तर एकूण जाहीर केलेल्या १२ हजार १४० जागांपैकी पाच हजार ८२२ जागा अजून भरणे बाकी आहे.

Shikshak Bharti 2022

गेल्या वर्षी ९ ऑगस्टला  राज्य शासनाने पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीशिवाय नियुक्ती द्यावयाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर ५ सप्टेंबरला ऐन शिक्षक दिनी हजारो उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रेही प्रदान केले. मात्र त्यानंतर मुलाखतीसह नियुक्तीचा पर्याय निवडलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रलंबित राहिली.  त्यातच कोरोना संकटामुळे वित्त विभागाने ४ मे रोजीच्या निर्णयानुसार भरती प्रक्रियेवर बंदी आणली.

शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरू
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक दिनीच उमेदवारांना गोड बातमी कळण्याची दाट शक्यता आहे. कारण  पवित्र पोर्टलला पुन्हा एकदा गती आली असून गुरुवारी उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ३१ ऑगस्ट ही अखेरची मुदत देण्यात आली आहे.
कोणी भरावे प्राधान्यक्रम

  • आता माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदासाठी प्राधान्यक्रम देता येईल.
  • ज्यांना यापूर्वी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने उच्च माध्यमिकचे प्राधान्यक्रम आले नव्हते, परंतु त्यांनी पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली, त्यांना प्राधान्यक्रम भरता येईल.
  • तसेच माध्यमिक गटासाठी पदवीला ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने ज्यांना प्राधान्यक्रम आले नव्हते, त्यांनाही आता मुलाखतीसह पदाचे प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
  • ज्यांनी यापूर्वीच मुलाखतीसह संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केले, त्यांना प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही

Maharashtra Shikshak Bharti 2022

Corona’s lockdown has led to the recognition of stagnant teacher recruitment in universities. It consists of four benches and 80 percent of the posts have been approved. Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University Jalgaon, Sant Gadge Baba Amravati University, Poet Vice-Chancellor Kalidas Sanskrit University (Ramtek), Gondwana University (Gadchiroli) Dhanraj Mane, Director of Higher Education has informed in a letter to recruit teachers. All these four non-agricultural universities have completed the advertisement process for teacher recruitment. Further proceedings were postponed as the lockdown began in March.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठांमध्ये रखडलेल्या शिक्षक भरतीला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यात चार विद्यापीठांचा समावेश असून ८० टक्के पदांना मान्यता मिळाली आहे.

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) या चार विद्यापीठांमध्ये रखडलेली शिक्षक भरती करण्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी पत्राव्दारे कळविले आहे.

या चारही अकृषी विद्यापीठांनी शिक्षक भरती संदर्भात जाहिरात प्रक्रिया पूर्ण केली आहे. मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्याने पुढील प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.


बीएड पदवीधारकाला प्राथमिक शाळांत संधी

इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना ‘बीएड’चे शिक्षण घेतलेले उमेदवार प्राथमिक शिक्षक म्हणून अध्यापन करू शकतात. या उमेदवारांना सेवेत रुजू झाल्यानंतर सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स दोन वर्षात पूर्ण करावा लागेल, असा महत्त्वाचा निकाल मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

Teacher recruitment was announced on 2021 & for this recruitment process in December 2017 month examinations was conduct. Near about 2 years waiting first selection list was declared on Friday. In this selection list published, there are more than 90% students selected are not belong to Ratnagiri – Sindhudurg district. Therefore the local person who applied for the recruitment process get upset as was happened in the years 2010. Konkan B.Ed., D.Ed. committee head said that, the teacher recruitment process is conduct at state level, therefore there is less chances for the selection of the students for this.

In Rantnagiri – Sindhudurg districts, the people replaces there jobs location as per the there confirmations, due to this vacant position in schools are increases & also there is students loss. Due to this there is the number of teacher replacement process is more. To avoid this Ratnagiri – Sindhudurg Jilha Parishad decide to give priority to civilians. But now for this, the recruitment process again started at state level. Therefore now there is now chance for civilian B.Ed., D.Ed. applicants. In years 2010 teacher recruitment process there was selection of 37 applicants for 1157 posts of civilians.

At beginning of the recruitment process there was total 12140 vacancies was available to conduct the recruitment process. For this, there was 5822 applicants selection list was declared. By the declaration of the selection list there was 3258 number of posts are still vacant in the recruitment process.

Shikshak Bharti 2021 new update by pavitra portal is that the bharti process is expected to start from 9th August 2019. More updates & details about this process are given below.  is in the important Phase now of Interviews, Selection & Merit lists. Few days remaining to fill the online registration form, Candidates apply for shikshak (teacher) posts as soon as possible. complete details and online apply link available on official portal i.e. Pavitra Portal.

Shikshka Bharti 2022

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी संस्थांच्या शाळातील शिक्षकांच्या १२ हजारहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

अर्ज कसा दाखल कराल आणि लॉक बद्दल माहिती देणारा व्हिडीओ

अर्ज कसा करावा सूचना

Maharashtra Shikshka bharti 2022 Application process is starting soon The Shikshka bharti Advertisement id published by CM Shri Devendra Fadnavis Today on 28 Feb 2019.  As per the News source given below. The Online Application Forms & News Selection process of Shikshk Bharti 2022 are given here. The Candidates Can apply Online & Select their respective Center to Submit the Choice of School. More updates & Details about teachers Recruitment 2019 will be published on govnokri.in. Now the Coming First  Advertisement will be issued For 11 Thousand Posts on teachers. Now the schools are uploading the Advertisement on Pavitra Portal. Very Soon Application process will start.

State Teachers recruitment process 2 thousand posts are increased. Before this Maharashtra Teachers recruitment was released notification for filling up 10 thousand 1 posts. No these posts are increased to 12 thousand 1 posts. Detailed advertisement for the recruitment to these posts is released already.

Since last 9 years, in Maharashtra state teachers recruitment process was not conduct. Now for the Maharashtra Teachers Recruitment 2019 total number of the posts are increased to 12 thousand 1 vacancies. Since teachers recruitment process is pending since 9 years therefore there are so many number of employees are still waiting for the teachers recruitment process. At the start of the teachers recruitment process by the rough calculation of the recruitment there was more number of the applicants than the total number vacant posts. Now the education department increase the total number of posts for recruitment. Also there are some private institutes posts are also available for the recruitment. Now as per the now increment in the vacant post the total number of the posts 12 thousand 1 posts.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Admin says

    30 thousand vacancy filled in this year

  2. Admin says

    Marathi School Shikshak Bharti Details

  3. anand says

    whenever open pavitra portal to filling form and registration for the sanstha

  4. Mangesh raut says

    सर b.ed अॅपियर स्टुडन्ट पवित्र पोर्टल मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो का

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!