नववी आणि अकरावीचे विद्यार्थी परीक्षेशिवाय पास
9th and 11th class students examination
9th and 11th class students examination will not be held, they will be passed without examination, informed the Department of Education.
राज्य मंडळाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमागोमाग नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही या शैक्षणिक वर्षात वर्गोन्नती देण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली.
9th and 11th Class Re-Exam 2020
9th and 11th Class Re-Exam 2020: Students who have failed in class IX and XI are re-examined. However, students and parents protested that the state government had not issued any order for the examination this year. After this, the government finally woke up and on Wednesday, the government issued an order to conduct the oral examination of these unsuccessful students through video conferencing
नववी, अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार
इयत्ता नववी व अकरावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. मात्र यंदा ही परीक्षा घेण्याबाबत राज्य सरकारने कोणताही आदेश दिलेला नव्हता याबाबत विद्यार्थी व पालकांनी आंदोलन केले. यानंतर अखेरी सरकारला जाग आली आणि बुधवारी या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारा तोंडी परीक्षा घ्यावी असे आदेश सरकारने काढले.
SSC HSC Re Exam 2020
इयत्ता नववी व अकरावीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर त्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. मात्र यंदा या परीक्षांबाबत सरकारने अद्याप कोणताही आदेश दिला नव्हता. त्यामुळे नेमके काय करायचे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला होता. तर या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी पालकांकडून होत होती. परंतु याबाबत प्रचलित नियमांनुसार विद्यार्थ्यांचा निकाल लावावा, असे सरकारने स्पष्ट केले होते. यामुळे शाळांनी तसा निकाल लावल्याने प्रत्येक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमधील सुमारे ८ ते १० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामुळे या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचे असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला होता.
शिक्षक परिषदेने याबाबत सरकारकडे निवेदन देऊन निर्णय घेण्याची मागणी केली होती. तर मंगळवारी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आंदोलनही केले होते. यानंतर सरकारने हे आदेश काढले आहेत. या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन त्यांना संधी देण्याची सूचना सरकारने केली आहे. यासाठी ७ ऑगस्टपर्यंत या विद्यार्थ्यांना शक्य असेल तेथे प्रत्यक्ष शाळेत बोलवून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोंडी परीक्षेचे आयोजन करावे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई