मुंबई पोलिस प्रशिक्षण केंद्रांतील ८१९ पदे कंत्राटी पद्धतीने भरणार – Mumbai Police Bharti 2023
Mumbai Police Recruitment 2023
मुंबई पोलिस प्रशिक्षण केंद्रांतील ८१९ पदे कंत्राटी पद्धतीने भरणार
कंत्राटी भरती विरोधात कर्मचारी संघटनांसह विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत असला तरी सरकारने विविध संवर्गात अशा भरतीची प्रक्रिया चालूच ठेवली आहे. विशेषतः मुंबई पोलिस दलात तीन हजार जवानांची कंत्राटी पद्धतीने भरतीचा वाद ताजा असतानाच आता राज्यातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 819 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास गृहविभागाने मान्यता दिली आहे. राज्यभरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रांतील विविध पदांच्या आकृतिबंधास गृहविभागाने मान्यता दिली आहे.
Director General of Police, Maharashtra State, Mumbai invited application from Retired Assistant Accounts Officer, Accounts Officer, Chief Clerk and Office Superintendent. Mumbai Police Conducted direct interview for filling above posts on contract basis. There are total 10 vacancies available for these posts. Financial Matters / Sample application form, affidavit, experience, age limit, monthly salary, allowances, duties & Responsibilities, terms and conditions have been made available on the website of the Director General of Police www.mahapolice.gov.in. However, the qualified aspirants should submit their application, affidavit and original documents dt. 23/08/2023 at 11.00 a.m. Karyasana No. 8 to attend the office of Director General of Police, State of Maharashtra, Mumbai at Shaheed Bhagat Singh Marg, Colaba, Mumbai at own expense for personal interview. Kindly read the complete details given below on this page regarding the Mumbai Police Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, प्रमुख लिपिक यांची सेवा करार पद्धतीने १० पदे भरण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखत आयोजित. वित्तविषयक बाबी / महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेच्या वैद्यकीय देयकांचे लेखांकन करणे व इतर लेखाविषयक कामासाठी सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, प्रमुख लिपिक यांची सेवा करार पद्धतीने घेण्याबाबत अर्जाचा नमुना, प्रतिज्ञापत्र, अनुभव, वयोमर्यादा, मासिक पारिश्रमिक, भत्ते, कर्तव्य व जबाबदाऱ्या, अटी व शर्ती पोलीस महासंचालक यांच्या www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी अर्हता प्राप्त इच्छुकांनी त्यांचे अर्ज, प्रतिज्ञापत्र व मूळ कागदपत्रांसह दि. २३/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कार्यासन क्रमांक ८ पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
Latest update regarding the 3000 posts bharti in Mumbai Police – 10 thousand police posts are currently vacant in Mumbai-Pune city, it will take one and a half years until new recruitment. Other policemen from the police force will be used for Mumbai-Pune city till the new policemen are trained. Their duration will be eleven months. Pune-Mumbai are sensitive cities. Therefore, recruitment from outside contractors will not be done. Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis has disclosed in this regard. Kindly read the complete details given below on this page regarding the Mumbai Police Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates
मुंबई-पुण्यात कंत्राटी पोलिसांची भरती? देवेंद्र फडणवीसांचा खुलासा
- मुंबई आणि पुणे शहरात कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचं बोललं जातं होतं. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. मुंबई आणि पुणे संवेदनशील शहरे आहे. याठिकाणी कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती होणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते विधानसभेत बोलत होते.
- देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही प्रकारे पोलिसांची कंत्राटी भरती होणार नाही. पोलिसांची 10 हजार पदे सध्या मुंबई-पुणे शहरात रिक्त आहेत, नवीन भरती होईपर्यंत दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. नवीन पोलिस प्रशिक्षित होईपर्यंत पोलिस दलातील इतर पोलिस मुंबई-पुणे शहरासाठी वापरले जातील. त्यांचा कालावधी अकरा महिन्यांचा असेल. पुणे-मुंबई संवेदनशील शहरे आहेत. त्यामुळे बाहेरच्या कंत्राटदारांकडून भरती केली जाणार नाही.
- राज्यात पोलिस भरती सुरु करण्यात आली आहे. 18000 पोलिसांची भरती केली जाईल. त्यामुळे राज्यात पोलिस मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. 1960 नंतर पहिल्यांदाच पोलिसांच्या संख्येची पुनर्रचना केली जाणार आहे. आता प्रत्येक स्टेशनला किती पोलिस अधिकारी पाहिजेत, किती कर्मचारी हवेत, किती लोकांमागे एक स्टेशन हवे, हे निश्चित केलं जाणार आहे. 1960 च्या लोकसंख्येनुसार नाही तर 2023 च्या लोकसंख्येनुसार पुनर्रचना केली जाणार आहे.18522 पदांना सुधारतील आकृतीबंधानुसार मान्यता दिली आहे, असंही फडणवीस म्हणाले.
- महिला सुरक्षा समिती स्थापन केली आहे .महिलांवरील अत्याचार प्रकरणे हताळण्यासाठी 27 न्यायालये आणि 86 जलद गती न्यायालये स्थापन्यात आली आहेत. बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत प्रकरणासाठी 138 विशेष न्यायालये स्थापन केली आहेत. बलात्काराच्या प्रकरणात 60 दिवसात आरोपपत्र दाखल केले जात आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या ठिकाणी दामिनी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती फडणविसांनी विधानसभेत दिली.
Mumbai Police 3000 posts recruitment updates – There are about 10,000 vacancies in constable cadre in Mumbai Police Force. Every year about 1,500 policemen retire and their inter-district transfers also take place. There is no police recruitment in 2019, 2020 and 2021. 500 policemen have died due to diseases, accidents and corona virus. Vacancies in the state. Considering the posts, the government has approved the filling of 14,956 police constables and 2,174 driver cadre posts and state reserve police force. At present the recruitment process of 18,331 posts is going on. 7,076 constable and 994 driver cadre posts are to be filled for Mumbai Police Commissionerate. Still some The posts will remain vacant. Since it will take one and a half to two years to complete the recruitment and training process, the Police Commissioner requested the State Security Corporation to provide 3,000 manpower on April 17, 2023. The state government has approved it,” said Fadnavis. explained. “These manpower services have been made available on a temporary basis for the period of direct recruitment or a maximum of 11 months. The services of outsourced manpower will be terminated after availability of regular police constables,” Fadnavis said.
मुंबई पोलीस दलात बाययंत्रणेमार्फत तीन हजार मनुष्यबळ
मुंबई पोलीस दलात सुमारे दहा हजार पोलीस शिपायांची पदे रिक्त असल्याने बाह्य यंत्रणेमार्फत तात्पुरत्या स्वरुपात तीन हजार मनुष्यबळ ( कर्मचारी) उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळाकडून हे मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार असून, त्यांना सुरक्षाविषयक आणि बंदोबस्ताचे ( गार्ड व स्टॅटिक ड्यूटी) काम देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार नसल्याची ग्वाही बुधवारी विधिमंडळात दिली.
- मुंबई पोलीस दलात बाह्ययंत्रणेमार्फत तीन हजार मनुष्यबळ सेवा राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यास गृहविभागाने २४ जुलै २०२३ रोजी शासननिर्णय जारी करून परवानगी दिली होती. त्यामुळे पोलीस दलात कंत्राटी भरती सुरू झाली, असा आक्षेप विरोधकांकडून विधानपरिषदेत मंगळवारी घेण्यात आला होता. यासंदर्भात फडणवीस यांनी बुधवारी सभागृहात सविस्तर निवेदन केले. “मुंबई पोलीस दलात शिपाई संवर्गातील सुमारे १० हजार पदे रिक्त आहेत. दरवर्षी सुमारे दीड हजार पोलीस सेवानिवृत्त होतात आणि त्यांच्या आंतरजिल्हा बदल्याही होतात. २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये पोलीस भरती झालेली नाही.
- आजार, अपघात आणि करोनामुळे ५०० पोलीस मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील रिक्त पदांचा विचार करून १४ हजार ९५६ पोलीस शिपाई आणि २१७४ चालक संवर्गातील आणि राज्य राखीव पोलीस दलातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सध्या १८ हजार ३३१ पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ७०७६ शिपाई आणि ९९४ चालक संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. तरीही काही पदे रिक्त राहणार आहेत. भरतीप्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण होऊन पोलीस शिपाई उपलब्ध होण्यासाठी दीड ते दोन वर्षे लागणार असल्याने पोलीस आयुक्तांनी १७ एप्रिल २०२३ रोजी राज्य सुरक्षा महामंडळाकडून तीन हजार मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती. त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे”, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
- “प्रत्यक्ष पदभरतीचा कालावधी किंवा जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी या मनुष्यबळाच्या सेवा तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नियमित पोलीस शिपाई उपलब्ध झाल्यानंतर बाह्ययंत्रणेमार्फत नेमल्या गेलेल्या मनुष्यबळाच्या सेवा संपुष्टात येतील’, असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारचेच महामंडळ असलेल्या राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जवानांमार्फत विविध केंद्र आणि राज्य शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सार्वजनिक ठिकाणे आदींसाठी नियमितपणे सुरक्षा वापरली जात आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. - ‘सेवानिवृत्तांच्या नियुक्त्यांबाबतही विचार’ – बाह्यस्त्रोतांद्वारे कर्मचारी नियुक्त करण्याऐवजी ६२-६३ वयापर्यंतच्या इच्छुक आणि तंदुरुस्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अॅड. अनिल परब यांनी केली. त्यांचे प्रशिक्षण झालेलेच असते आणि दलात काम केले असल्याने सर्व बाबींची माहिती असते, असे परब यांनी नमूद केले. त्यावर त्यातून कोणते कायदेशीर मुद्दे उपस्थित होतील, हे तपासून या पर्यायाचाही विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
- ‘कायदा अंमलबजावणी, तपासाचे काम नाही’ – या कर्मचाऱ्यांना कायदेविषयक अंमलबजावणी आणि तपासाचे कुठलेही काम दिले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भरती प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नियमित पोलीस शिपाई उपलब्ध होतील आणि या बाह्ययंत्रणेकडून उपलब्ध झालेल्या मनुष्यबळाची सेवा संपुष्टात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
Mumbai Police Bharti 2023 for 3,000 posts will be held soon on contract basis. The Home Department has decided to recruit 3000 contract police shipai in the Mumbai Police Force. As per the information this recruitment will be done through the State Security Corporation on contractual basis for a maximum period of 11 months and this is the first such decision. The decision has been taken by the Home Department on the request of the Commissioner of Police as the Mumbai Police has a severe shortage of manpower. While there has been a controversy over contractual recruitment in the state government service, now contract recruitment is going to be done in the police force as well.
40,623 Posts of Constable to Assistant Inspector have been sanctioned for Mumbai Police Force. Out of them 10,000 posts are vacant and there is shortage of manpower for day to day operations. There is an acute shortage of manpower in the police force. Due to the protection of political leaders, more manpower is needed. During festivals like Dahihandi, Ganeshotsav, Navratri, Ramzan, Diwali, extra police are required for security. Therefore, the Commissioner of Police insisted on recruiting contract police, said senior officials of the Home Department. Kindly read the complete details given below on this page regarding the Mumbai Police Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates
मुंबई पोलीस भरती आता कंत्राटी पद्धतीने, 3 हजार पदे भरणार
मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद झाला असतानाच आता पोलीस दलातही कंत्राटी भरती केली जाणार आहे. मुंबई पोलीस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची ४०,६२३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी १० हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे.
पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आहे. राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा पोलीस आयुक्तांचा आग्रह होता, असे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
गरज का?
- राज्य सरकारने २१ जानेवारी २०२१ रोजी ७,०७६ शिपाई आणि ९९४ वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे.
- ही भरतीप्रक्रिया आणि या शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन हे मनुष्यबळ दाखल होण्यास दोन वर्षे लागणार आहेत.
- तोपर्यंत कंत्राटी पोलिसांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी केली जाणार आहे.
बदल्यांमुळे पोकळी..
- संजय पांडे पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी तीन ते चार हजार पोलिसांना बदलीवर मुंबईबाहेर जाऊ दिले होते. त्यामुळे मोठी मनुष्यबळ पोकळी निर्माण झाली होती. आताही अनेक पोलिसांची मुंबईबाहेर बदली झाली आहे. त्यांना तेथे रुजू व्हायचे आहे. परंतु मुंबईतील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्यांना जाऊ दिले जात नाही, असे सांगण्यात येते.
Mumbai Police Bharti 2021 Exam cancel, take a Re-Exam in transparent manner – see the details here. Congress State President Nana Patole has demanded that Chief Minister, Deputy Chief Minister and Director General of Police cancel the recruitment process of Mumbai Police Bharti 2021 and conduct a re-examination as it has been revealed that malpractices have taken place in police recruitment in Mumbai. Nana Patole has said that there have been many complaints regarding hi-tech companies, qualifying candidates with low marks, taking lakhs of rupees for recruitment, depriving qualified students and recruiting those who have adopted corrupt ways into the police force. Kindly read the complete details given below on this page regarding the Mumbai Police Recruitment Result and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates
मुंबई पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्या
मुंबईतील पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार घडल्याचे उघड झाले असल्याने भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घ्या अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांकडे केली आहे. हायटेक कॉंपी, कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना पात्र ठरवणे, भरतीसाठी लाखो रुपये घेणे, पात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेल्यांना पोलीस दलात भरती करणे अशा अनेक तक्रारी यासंदर्भात आल्या असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
Mumbai Police Bharti Result Updates
- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना यासंदर्भात पटोले यांनी पत्र पाठवले आहे. या भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.
- मुंबई पोलीस दलात झालेल्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पोलीस महासंचालकांकडे केली.
- अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. 7 मे रोजी मुंबईत झालेल्या पोलीस भरतीमध्ये पुढीलप्रमाणे गैरप्रकार झाल्याचे दानवे यांनी निवेदनात नमूद केले आहेत.
- पोलीस भरतीमधील गैरप्रकारांच्या निषेधार्थ 24 मे रोजी काही उमेदवार आझाद मैदानावर उपोषण आंदोलन करण्यासाठी गेले होते, परंतु पोलिसांनी त्यांना हाकलून लावले तर काहींना गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
- चार गुन्हे दाखल होऊनही निकाल केला जाहीर – पोलीस भरतीमधील गैरप्रकारांबाबत चार स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतरही परीक्षेचा निकाल 17 मे रोजी जाहीर केला गेला. शासनाच्या धोरणाप्रमाणे टीसीएस, आयबीपीएस या संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणे आवश्यक असतानाही त्याचे पालन केले गेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
- कमी गुण मिळवणारे उमेदवारही पात्र – गुणवत्ता यादीसाठी ठरवण्यात आलेले गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही भरतीसाठी पात्र ठरवण्यात आले. आर्थिक दुर्बल गटातील 118 गुण असणारा विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे, तर 116 गुण असणाऱया विद्यार्थ्याला पात्र ठरवण्यात आले. शारीरिक चाचणीमध्ये गुणवत्ता यादी 36 गुणांवर लागली तरी 35 गुण असलेल्या उमेदवाराला लेखी परीक्षेस बसण्यास परवानगी दिली गेली. शारीरिक परीक्षेत पात्र असूनही अनेक उमेदवारांना लेखी परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात आले नाही.
- पोलीस भरतीच्या लेखी पेपरवेळी मोठय़ा प्रमाणात हायटेक कॉफी करण्यात आली.
- परीक्षा पेंद्रावर प्रवेश करताना काही उमेदवारांची बायोमेट्रिक घेतली गेली, तर काहींची घेतली गेली नाही.
- पोलीस पर्यवेक्षकांनी काही उमेदवारांना मोबाईलमध्ये उत्तरे सर्च करून दिली.
- स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पुराव्यासहित दहिसर पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही.
- मेरिटमध्ये कमी गुण असणाऱया उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांची नावे मेरिटमध्ये समाविष्ट केली गेली आणि जास्त गुण असलेल्या उमेदवारांना डावलले गेले.
- शारीरिक चाचणीमध्ये काही उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना गुण वाढवून देण्यात आले.
- पोकळ भरती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून आर्थिक लाभ घेऊन मेरिट लिस्टमध्ये नावे समाविष्ट करण्यात आली.
- उत्तरपत्रिकेवर कोणीही नाव व नंबर लिहू नये असा नियम ठेवूनही पर्यवेक्षकांनी काही उमेदवारांना नाव व नंबर लिहायला सांगितले.
- या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, पोलीस भरती प्रक्रियेत जास्त मार्क असलेल्यांना वगळून कमी मार्क्स मिळालेल्या मुलांना भऱती करून घेण्यात आले आहे. शारिरिक चाचणीमध्येही पैसे घेऊन गुण वाढवण्यात आले, शारिरिक चाचणीत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. पोलीस दलात भरती होण्यासाठी काही मुलांकडून 15-15 लाख रुपये घेण्यात आले असून या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेल्यांना पोलीस दलात भरती करण्यात आले. अशा प्रकारच्या तक्रारी या भरती प्रक्रियेतील मुला-मुलांनी आमच्याकडे केल्या आहेत.
- पोलीस दलात अशा प्रकारे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून भरती केल्याच्या ज्या तक्रारी येत आहेत त्या गंभीर आहेत. या पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी व त्यात जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करावी. मुला मुलींच्या तक्रारी पाहता पोलीस भरती प्रक्रियाच संशयास्पद वाटत आहे म्हणून मुंबईत पार पडलेली पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन परिक्षा पुन्हा व पारदर्शक पद्धतीने घ्यावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
Mumbai Police Recruitment 2022
Mumbai Police Bharti 2022: Latest updates regarding Mumbai Police Bharti 2022 is that there are 8 thousand 747 vacancies in Mumbai Police Force. Vacancies are burdening many with additional responsibilities. Police recruitment will be done soon in the state, so the work load on the police force will be reduced. Candidates Read the complete details given below on this page regarding the Mumbai Police Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
मुंबई पोलीस दलात ८ हजार ७४७ पदे रिक्त
मुंबई : राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमुळे पोलीस दलावरील ताण कमी होण्यास मदत होईल. मुंबई पोलिसांच्या गेल्या वर्षीच्या वार्षिक अहवालानुसार, मुंबई पोलीस दलात ८ हजार ७४७ पदे रिक्त आहे. अपुग्या मनुष्यबळाच्या जोरावर मुंबई पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले.
Police Bharti- तरुणांनो खुशखबर! राज्य पोलीस दलात 20 हजार पदांची भरती
मुंबई पोलीस दलात ४६ हजार २१२ इतक्या मंजूर पदांपैकी ३७ हजार ४६५ पोलीस कार्यरत आहेत. यामध्ये ८ हजार ७४७ पदे रिक्त असल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या खांद्यावर मुंबईची जबाबदारी आहे, यामध्ये अधिकारी वर्गाच्या १ हजार ३६१ तर कर्मचारी ७ हजार ३८६ जागांचा समावेश आहे.
दुसरीकडे मुंबईत गेल्या वर्षभरात ६४ हजार ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये दरोडा, जबरी चोरी/सोनसाखळी चोरी, घरफोडी, चोरी, वाहन चोरीच्या गुन्ह्यात एकूण १२२ कोटी,३१ लाख, २४ हजार ४४७ रुप्यांची मालमत्ता चोरी गेली. यापैकी ५३ कोटी १६ लाख ७४ हजार ५९३ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. २०१९ मध्ये ३४ टक्के, २०२० मध्ये ३३ टक्के तर २०२१ मध्ये याचे प्रमाण वाढून ४३ टक्क्यावर गेले आहे.
Police Bharti Sample Paper Online
Police Bharti Old Paper Online
अधिकारी वर्गाची हजाराहून अधिक पदे रिक्त
रिक्त पदांमध्ये अधिकारी वर्गाच्या १ हजार ३६१, तर कर्मचारी ७ हजार ३८६ जागांचा समावेश आहे. त्यामुळे अनेकांवर अतिरिक्त जबाबदारीचा भार येत आहे.
Mumbai Police Recruitment 2022- Vacancy Details
Latest Mumbai Police News !