पदवी परीक्षा: सुप्रीम कोर्टातील सुनावणी ३१ जुलैपर्यंत तहकूब

University Final Year Exams 2020

पदवी परीक्षा: सुप्रीम कोर्टातील सुनावणी ३१ जुलैपर्यंत तहकूब

सर्वोच्च न्यायालयाने यूजीसीची बाजू मांडणारे वकील तुषार मेहता यांना सर्वोच्च न्यायालयाने २९ जुलै पर्यंत एक सामायिक उत्तर नोंदवण्यास सांगितले आहे.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांसदर्भातील याचिकेवरील सुनावणी शुक्रवार ३१ जुलै पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने ४ जुलै रोजी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यानुसार विद्यापीठांनी ३० सप्टेंबरच्या आत परीक्षा घ्याव्यात असे निर्देश विद्यार्थ्यांना करण्यात आले. या मार्गदर्शक तत्त्वांना विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. अशोक भूषण आणि आर. सुभाष रेड्डी आणि बी.आर. गवई यांच्या खंडपीठाने आज सुनावणी घेतली. यूजीसीची बाजू मांडणारे वकील तुषार मेहता यांना सर्वोच्च न्यायालयाने २९ जुलै पर्यंत एक सामायिक उत्तर नोंदवण्यास सांगितले आहे. याचिकाकर्त्यांनी ३० जुलैपर्यंत त्यांची बाजू मांडावी असे सांगितले आहे.

एकूण ३१ याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केल्या आहेत. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह काही विधी शाखांचे विद्यार्थी, विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, यूजीसीची बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले की, ‘देशातील ८१८ विद्यापीठांपैकी ३९४ विद्यापीठांनी पदवी परीक्षांची प्रक्रिया संपवली आहे किंवा संपवती आहेत. २०९ विद्यापीठांच्या परीक्षा झाल्या आहेत.’

कोविड – १९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या महामारीच्या स्थितीत परीक्षा न घेणे विद्यार्थी हिताचे नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

याचिकाकर्त्यांनी मांडलेले अन्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत –

१) संबंधित यंत्रणांशी कोणतीही चर्चा केल्याशिवाय परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

२) बिहार, आसाम आणि ईशान्येतील अन्य राज्यातील लाखो विद्यार्थी सध्या पुराच्या संकटाचा सामना करत आहेत.

३) वाहतुकीसाठी रेल्वे किंवा अन्य सोयीसुविधा अद्याप सुरळीत झालेल्या नाहीत.

४) विद्यार्थांची लॉकडाऊनमुळे राहण्याचीदेखील पुरेशी व्यवस्था होत नाहीए.

५) कोविड – १९ महामारीमुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. पालकांकडे मुलांच्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा नाही. अशात परीक्षांसाठी लागणारा वाहतूक, निवास, वैद्यक असा इतर खर्च पालक सध्या करू शकणार नाहीत.


पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याची परवानगी द्या; राज्याची UGC कडे मागणी

University final year exams: Higher and Technical Education Minister Uday Samant has sent a letter to the chairman of the University Grants Commission seeking cancellation of the final year final examination of students of universities and affiliated colleges in Maharashtra. The decision regarding the degree examinations will be announced in the next two days, said Samant. He was talking to students through Facebook Live today.

कोविड – १९ विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली आहे.

University final year exams: महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतील आणि संलग्न महाविद्यालयांधील विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांना पाठवले आहे. येत्या दोन दिवसात पदवी परीक्षांसंदर्भातला निर्णय जाहीर होईल, अशी माहिती सामंत यांनी दिली. ते आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी बोलत होते.

महाराष्ट्रातल्या आठ ते दहा लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्य परिस्थितीचा विचार करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द कराव्यात आणि या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन यूजीसीच्या नियमावलीच्या आधारे करावे, असं पत्र आम्ही सोमवारी १८ मे रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला दिलं आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या परीक्षा रद्द करत असताना कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने विद्यापीठे ग्रेडेशन पद्धती राबवतील, अशी हमी देखील या पत्रात दिली असल्याचे सामंत यांनी सांगितले.

पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा १ ते ३० जुलै या कालावधीत घेण्यात याव्यात, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने या परीक्षांच्या घोषणा केल्या होत्या. मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या माध्यमातून यूजीसीला पत्र देऊन विनंती केली होती की ज्याप्रमाणे पदवीच्या अन्य वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या, त्याचप्रमाणे अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील रद्द कराव्यात. सोमवारी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मी स्वत: पत्र लिहिलं. त्या पत्रात जी महाविकास आघाडीची भूमिका आहे, जी विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका आहे, त्यानुसार मी मागणी केली की विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात. राज्यात आज अनेक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. लॉकडाऊन स्थितीही ३१ मे पर्यंत कायम आहे. त्यामुळे या परीक्षा घेणं आम्हाला शक्य होणार नाही,

मूल्यांकन कसे होणार

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या तर ग्रेडेशन पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येईल. त्यासाठी यूजीसीच्या नियमावलीनुसार प्रक्रिया करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

सीईटी परीक्षा होणार

सीईटी परीक्षा घेणं आवश्यक आहे. त्याचं वेळापत्रक सध्या जाहीर केलं आहे. जिल्हा स्तरावर होणारी सीईटी परीक्षा आता तालुका स्तरावर घेतली जाईल.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात येईल. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात येईल. दरम्यान, पीजी मेडिकल प्रवेशाची प्रक्रियादेखील सुरू केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!