Ratnagiri Arogya Vibhag -रत्नागिरी जिल्हातील आरोग्य विभागात सुमारे 381 पदे रिक्त
Ratnagiri Arogya Vibhag Bharti 2022
Arogya Vibhag Ratnagiri Bharti 2022 – There are about 381 vacancies in the health department of Ratnagiri district at present. As a result, the health department has to work hard while running its operations. The Zilla Parishad has 67 primary health centers and 141 posts of two medical officers were sanctioned in each health center. They are all filled. However, there are 309 vacancies in Class 3 and 72 vacancies in Class 4 and this number is increasing day by day. The number of retirees has been increasing due to non-recruitment in the last few years. Read More regarding Ratnagiri Arogya Vibhag Bharti 2022 are given below.
Arogya Vibhag Bharti: आरोग्य विभागात ९७३ पदे रिक्त
Arogya Vibhag Bharti – राज्यात आरोग्य कर्मचार्यांची 7 हजार पदे रिक्त
सध्या कोरोना जिल्ह्यातून जवळपास हद्दपारच झाला आहे. गेले काही दिवस एकही रुग्ण सापडलेला नाही. यामुळे आरोग्य विभागावरील ताण कमी झाला असला तरी वर्ग 3, वर्ग 4 ची कर्मचार्यांची पदे दिवसेंदिवस रिक्त होत निघाली आहेत. सुमारे 381 पदे सध्या रिक्त आहेत. यामुळे कामकाज चालवताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गतवर्षी वैद्यकिय अधिकार्यांच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर गेली होती. मात्र, त्याला पर्याय म्हणून कंत्राटी तत्त्वावर चांगले मानधन देऊन एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्यांची जिल्हास्तरावर भरती करण्याचा निर्णय झाला. शासनाने 40 हजार रुपये मानधनावर तदर्थ म्हणून नियुक्त करण्याचे अधिकारी जिल्हास्तरावर आरोग्य विभागाला दिले. जिल्हा परिषदेची 67 प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी अशी 141 पदे मंजूर होती. ती सर्वच्या सर्व भरलेली आहेत. परंतु, वर्ग 3 ची 309 आणि वर्ग 4 संवर्गातील 72 रिक्त पदे रिक्त असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षात नव्याने भरती न झाल्यामुळे सेवानिवृत्त वाढत आहेत.
- आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, परिचर हे कर्मचारी प्रत्यक्ष रुग्णाची देखभाल करण्यासाठी नियुक्त केले गेले आहेत. वैद्यकीय अधिकारी उपचार करत असतात, तर रुग्णांना अन्य सेवा देण्याची जबाबदारी कर्मचार्यांवर असते.
- पायाच डळमळायला लागल्याने आरोग्य सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागते. सगळ्याच आरोग्य केंद्रात ही परिस्थिती आहे. दुर्गम गावांमध्ये याचा सर्वाधिक फटका बसतोय. सेवानिवृत्तीने पद रिक्त झाल्यावर तेथे नियुक्ती कशी द्यायची असा प्रश्न तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकार्यांना पडतो.
- तदर्थ वैद्यकीय अधिकार्यांप्रमाणे तात्पुरती नियुक्तीसंदर्भात निर्णय घेतला तर यामधून सावरणे शक्य आहे. त्याचे अधिकार जिल्हास्तरावर दिल्यास उपयुक्त ठरेल, अन्यथा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल असे चित्र जिल्ह्यात असल्याचे दिसून येत आहे.
Arogya Vibhag Hall Ticket २८ नोव्हेंबरच्या आरोग्य विभाग ग्रुप क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
Public Health Minister Rajesh Tope said that vacancies in the health department in Ratnagiri district would be filled soon. 31 ambulances have been provided to Ratnagiri Zilla Parishad by the Arogya Vibhag Maharashtra. Read the details carefully given below and keep visit on our website for the further updates.
Arogya Vibhag Group D Examine 2021 hall ticket is live now. Candidates download it from below given link
आरोग्य विभाग ग्रुप ड परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
Arogya Vibhag Bharti Hall Tikcet – गट क व ड लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध
रत्नागिरीतील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 31 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी श्री.टोपे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात श्री. टोपे मंत्रालयातून सहभागी झाले.
Arogya Vibhag Bharti -आरोग्य विभाग भरती परीक्षेची नवीन तारीख जाहीर
- यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
- सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी राज्यात आतापर्यंत एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्यापैकी 31 रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत देण्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विशेष मदत होईल.
- रुग्णवाहिकांमुळे अर्भक-मृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी होण्यात मदत होईल. रुग्णवाहिकांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील गर्भवतींचा संस्थात्मक प्रसूती होईल, याकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशा सूचना श्री. टोपे यांनी दिल्या.
- लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी राज्य शासनाने मिशन कवच कुंडले अभियानात रत्नागिरी जिल्ह्यात जास्त जास्त लसीकरण करण्यासाठी रुग्णांची माहिती संकलित करुन ठेवावी, अशा सूचनाही श्री. टोपे यांनी दिल्या.
- लोकार्पण कार्यक्रमास रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण आणि अर्थ सभापती चंद्रकांत मंणचेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले उपस्थित होते.