१ जून ते १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार पदांची भरती? कृती आराखडा तयार- Mega Bharti 2023 updates
Mega Bharti 2023 for 75000 posts - Advertisement, Vacancy & Apply Link
Mega Bharti 2023 for 75000 posts
According to the earlier announcement of Chief Minister Eknath Shinde, about the mega bharti in various government department for 7 ,000 posts will be recruited in 2.5 months from 1st June 2023 to 15th August 2023. In this background, the government has prepared an action plan and the notification / advertisements will be released before 15th August 2023, sources said.
At present, vacancies have increased in local self-government bodies with important departments such as revenue, agriculture, school education, rural development, medical education, public health and housing, water resources (irrigation), women and child welfare, social justice, animal husbandry. Post-coronavirus, the finance department has lifted the restrictions on post-recruitment, so now there is no problem in post-recruitment. On the other hand, the government has to recruit in the background of the upcoming local self-government bodies, Lok Sabha, assembly elections, current political situation, increased unemployment in the state. Sources also said that the recruitment action plan has been prepared on a war footing. Read the more details given below and keep visit us.
१ जून ते १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार पदांची भरती? कृती आराखडा तयार
राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता कृती आराखडा शासनाने तयार केला असून १५ ऑगस्टपूर्वी जाहिराती प्रसिद्ध होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात सत्ताबदलानंतर शिंदे- फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते. २० ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब, क आणि गट- ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला.
Mega Bharti 2023 in this Department
सध्या महसूल, कृषी, शालेय शिक्षण, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व गृह, जलसंपदा (पाटबंधारे), महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय, पशुसंवर्धन अशा महत्त्वपूर्ण विभागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही रिक्त पदे वाढली आहेत. करोनानंतर वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध उठवल्याने पदभरतीस सध्या कोणतीही अडचण राहिलेली नाही. दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, राजकीय सद्य:स्थिती, राज्यात वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारला भरती करावीच लागणार आहे. त्या दृष्टीने भरतीचा कृती आराखडा युद्धपातळीवर तयार करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
Mega bharti updates is given here – More than 2.75 lakh posts are vacant under 43 departments of the state government. According to the announcement of Chief Minister Eknath Shinde, mega recruitment of 75,000 posts will be done in two and a half months from 1st June 2023 to 15th August 2023, before the Amrit Mahotsav of the country’s independence. The age limit of thousands of youths waiting for recruitment is also ending. In this background, senior sources in the general administration informed that the government has now prepared an action plan for mega recruitment. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
स्वातंत्र्यदिनापूर्वी ७५ हजार जागांची मेगाभरती – १ जून ते १५ ऑगस्टदरम्यान पदभरतीचे नियोजन
राज्य शासनाच्या ४३ विभागाअंतर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची मेगाभरती केली जाणार आहे. भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरुणांची वयोमर्यादादेखील संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेगाभरतीचा कृती आराखडाच शासनाने तयार केल्याची माहिती सामान्य प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- राज्यात सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात (ऑगस्ट २०२२) शिंदे-फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते. २० ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब, क आणि गट-ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. सध्या महसूल, कृषी, शालेय शिक्षण, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व गृह, जलसंपदा (पाटबंधारे), महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय, पशुसंवर्धन अशा महत्त्वपूर्ण विभागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही रिक्त पदे वाढली आहेत.
- दरम्यान, कोरोनानंतर वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध उठवल्याने पदभरतीस सध्या कोणतीही अडचण राहिलेली नाही. दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, राजकीय सद्य:स्थिती, राज्यात वाढलेली बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारला मेगाभरती करावीच लागणार आहे. त्यादृष्टीने भरतीचा कृती आराखडा युद्धपातळीवर तयार करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
- ३२ हजार शिक्षकांची भरती – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची ६७ हजार पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची ३० ते ३२ हजार पदे ऑगस्ट २०२३पूर्वी भरली जातील. पुढच्या वर्षी उर्वरित ५० टक्के पदभरती होईल, असे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
- राज्य सरकारमार्फत गेल्या दोन-तीन वर्षांपासून केवळ भरतीची घोषणा केली जात असून, आमच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचे मत उमेदवारांनी व्यक्त केले. सरकारमार्फत नोव्हेंबर २०२२ मध्ये ४ हजार तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती. परंतु, जाहिरात अद्यापही आलेली नाही. त्याचसोबत जानेवारीत वन विभागाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार होती. परंतु, मे उजाडला तरीही जाहिरात आलेली नाही.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच मेगाभरतीची घोषणा केली आहे. १५ ऑगस्टपूर्वी विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न असतील. – सुधीर मुनगुंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य मंत्री
- राज्यात गेल्या काही वर्षांपासून पासून अनेक वेळा सत्ता परिवर्तन झाले; परंतु राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. भरतीचे केवळ गाजर दाखविण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. राज्य शासनाने लवकरात लवकर मेगाभरती घ्यावी.- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
Shinde-Fadnavis government had announced to recruit 75,000 posts out of these vacancies. The government had also announced to complete the recruitment process before August 15, 2023 by conducting the recruitment process in a time-bound manner. To implement this recruitment process, in the Cabinet meeting held on 20th October 2022, it was decided to appoint companies TCS, IBPS for Group B, Group C and Group D recruitment outside the purview of Public Service Commission. When the government reviewed the recruitment process in the cabinet meeting held on 18 April 2023, it was revealed that only 6,499 of these posts have been filled so far. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
७५ हजार रिक्त पदभरतीची डेडलाइन हुकणार
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे – फडणवीस सरकारने केली होती. ही पदे १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत भरणार असल्याचेही जाहीर केले होते. मात्र, सरकार राज्यातील त्यापूर्वी जाहीर झालेली आणि विविध कारणांमुळे रखडलेली विविध विभागांची भरती प्रक्रिया सुरू करू शकलेले नाही. त्यात या नव्या भरतीबाबत प्रशासकीय पातळीवर संथ गतीने हालचाली सुरू असल्याने ७५ हजार पदे भरण्याची डेडलाइन हुकण्याची चिन्हे आहेत.
- राज्यात विविध विभागांची दीड लाख शासकीय व निमशासकीय पदे रिक्त आहेत. राज्यात सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट २०२२ मध्ये शिंदे- फडणवीस सरकारने या रिक्त पदांपैकी ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने भरती प्रक्रिया राबवून १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचेही सरकारने जाहीर केले होते. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी २० ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब गट क आणि गट ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- १८ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या भरती प्रक्रियेचा सरकारने आढावा घेतला तेव्हा यातील केवळ ६,४९९ पदे आतापर्यंत भरण्यात आल्याचे समोर आले.
- पूर्वीची रखडलेली भरती प्रक्रिया अद्याप सुरु नाही : राज्यातील जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदे भरण्याचा निर्णय २६ मार्च २०१९ रोजी घेतला होता. तेव्हापासून रखडलेली ही भरती प्रक्रिया ४ वर्षे २ महिने होऊनही ग्रामविकास विभाग घेऊ शकलेला नाही.
आरोग्य विभागाच्या ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्यामुळे रद्द करण्यात आलेली भरती अद्याप सुरु झालेली नाही. पशुसंवर्धन विभागाची २०१७ आणि २०१९ मध्ये जाहीर झालेली भरती प्रक्रिया १७ जानेवारी २०२३ रोजी रद्द करण्यात आली, ती भरतीही रखडलेली आहे.
राज्यात तलाठ्यांची पदे भरण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, त्याबाबतही अजून प्रगती झालेली नाही. - रखडलेली भरती प्रक्रिया लवकर सुरु करावी यासाठी आम्ही संबंधित मंत्र्यांचे उंबरठे झिजवले; पण परीक्षा लवकरच होईल एवढेच उत्तर आम्हाला मिळत आहे. सरकारची ही उदासीन भूमिका राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बरबाद करते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. -महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
Mega recruitment of 75 thousand posts in Maharashtra updates – In the Amrit Jubilee year of independence, the state government is going to do mega recruitment of 75,000 posts under direct service quota. These posts will be filled before August 15 and 18,939 posts of ‘Group-C’ cadre in all Zilla Parishads will be filled simultaneously. , online examination will be held for 19,000 Vacancies of Zilla Parishads. For this, computer systems of Government Industrial Training Institutes, Technical and Engineering Colleges will be hired. This online exam will be conducted by private companies IBPS and TCS. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
महाराष्ट्रात 75 हजार पदांची मेगा भरती अपडेट्स – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार थेट सेवा कोट्यातील 75 हजार पदांची मेगा भरती करणार आहे. ही पदे 15 ऑगस्टपूर्वी भरण्यात येणार असून सर्व जिल्हा परिषदांमधील ‘गट-क’ संवर्गातील 18 हजार 939 पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदांच्या 19 हजार जागांसाठी होणार ऑनलाइन परीक्षा. यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक व अभियांत्रिकी महाविद्यालयांची संगणक प्रणाली भाड्याने घेतली जाणार आहे. ही ऑनलाइन परीक्षा आयबीपीएस आणि टीसीएस या खासगी कंपन्या घेणार आहेत.
Mega Bharti 2023 Advertisement
Application Portal भरतीच्या जाहिरातीचा नमुना
- तसेच, मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार, यापूर्वी अर्ज केलेले सर्व उमेदवार देखील परीक्षेला बसू शकणार, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, ‘IBPS’ उमेदवारांसाठी ‘अॅप्लिकेशन पोर्टल’ विकसित करत आहे. या संदर्भात येत्या काही दिवसांत सर्व जिल्हा परिषदांना त्यांच्या भरतीच्या जाहिरातीचा नमुना, आरक्षणनिहाय रिक्त पदे, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता यांची सविस्तर माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे.
ZP Bharti 2023 Notification
जिल्हा परिषदांची अंतिम गुण यादी
- राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदूनामावली अंतिम करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. 21 नोव्हेंबर 2022 च्या सामान्य प्रशासनाच्या निर्णयानुसार, ही परीक्षा खाजगी कंपन्या ‘IBPS’ आणि ‘TCS’ द्वारे ऑनलाइन घेतली जाईल. ‘आयबीपीएस’ कंपनीने सामंजस्य करार (MOU) करून संबंधित जिल्हा परिषदेचे कार्यालय, सर्व नोडल अधिकारी आणि उपायुक्त, विभागीय आयुक्त यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले आहे. या आदेशानुसार 21 एप्रिलपर्यंत सामंजस्य करारावर स्वाक्षरी जिल्हा परिषद स्तरावर करण्यात यावी, असेही ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
Mega Recruitment 2023 Helpline
मेगा भरतीसाठी हेल्पलाइन
- राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी पदभरतीबाबत संक्षिप्त नियमावली तयार करून पदभरतीबाबत शासनाने केलेली कार्यवाही, जिल्हा परिषदांकडून सुरू असलेली कार्यवाही आणि पदभरतीची सद्यस्थिती याबाबत सर्वांना माहिती द्यावी, असे आदेशात सांगण्यात आले आहे. आगामी परीक्षेसाठीचा ‘कृती आराखडा’ सर्वांना दिसेल अशा ठिकाणी पोस्ट करावा. उमेदवारांना भरतीशी संबंधित काही माहिती किंवा शंका असल्यास त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी. परीक्षा पूर्ण होऊन उमेदवारांची नियुक्ती होईपर्यंत ही हेल्पलाइन सुरू ठेवावी, असे आदेशही ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
The Maharashtra state government had already issued an order to fill 20,ooo vacancies in the recruitment of 75,000 vacancies in direct service quota. After that orders have been issued again to fill 19,000 posts. All these posts are to be filled before 15th August 2023. Due to this order, the educated youth of the state will get employment. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
खुशखबर ! अखेर सरकारी भरतीची प्रतिक्षा संपली, इतक्या पदांसाठी निघाले भरतीचे आदेश
- राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त राज्य सरकारने अनेक घोषणा केलेल्या आहेत. त्यातलीच एक महत्वाची घोषणा म्हणजे सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली 75 हजार पदे भरण्याची घोषणा. यातील 20 हजार रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने याआधीच आदेश काढले होते. त्यापाठोपाठ आता पुन्हा 19 हजार पदे भरण्यासाठीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ही सर्व पदे 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरण्यात येणार आहेत. या आदेशामुळे राज्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
- ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी पदभरतीचे आदेश काढले आहेत. याबाबत त्यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निर्देश दिले आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.
There are large number of vacancies in all Zilla Parishads, Panchayat Committees, Municipal Corporations in the state. Therefore, the administration is going on there with less manpower. On the other hand, Home, Public Health, School Education and Sports, Revenue and Forests, Water Resources, Higher and Technical Education, Medical Education and Research, Pharmaceuticals, Tribal Development, Public Works, Co-operatives and Marketing, Social Justice, Industries, State Excise, Transport, There are more than 2.70 lakh vacancies in important departments like animal husbandry and agriculture. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
राज्याच्या शासकीय विभागांमध्ये जवळपास पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने राज्य सरकारने ७५ हजार शासकीय पदभरतीची घोषणा केली. पण, अद्याप पदभरतीची कार्यवाही सुरु झालेली नाही. राज्यात लाखो सुशिक्षित बेरोजगारांचे मेगाभरतीकडे लक्ष आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांसह आता पुढे लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मेगाभरती आचारसंहितेत अडकेल, अशी सद्य:स्थिती आहे.
- राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्तपदे आहेत. त्यामुळे कमी मनुष्यबळातच तेथील कारभार सुरु आहे. दुसरीकडे गृह, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण व क्रिडा, महसूल व वन, जलसंपदा, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, औषधी द्रव्ये, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, सहकार व पणन, सामाजिक न्याय, उद्योग, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पशुसंवर्धन व कृषी अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये दोन लाख ७० हजारांपेक्षा अधिक रिक्त पदे आहेत.
- सध्या पोलिस भरती वगळता उर्वरित कोणत्याच विभागाची पदभरती सुरु झालेली नाही. शिक्षक भरतीची घोषणा झाली, पण संच मान्यता व बिंदुनामावलीमुळे ती प्रक्रिया थांबली आहे. वित्त विभागाने पदभरतीला हिरवा कंदील दाखवूनही प्रक्रिया सुरु झालेली नाही. दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, विभागीय मंडळे असतानाही पदभरतीसाठी नऊ खासगी संस्था नेमल्या आहेत. तरीपण, ७५ हजार पदभरती सुरु होऊ शकलेली नाही, हे विशेष.
- Vacancy Details – शासकीय कर्मचाऱ्यांची स्थिती
- एकूण कार्यरत पदे – १४,९५,४९४
- वेतनावरील वार्षिक खर्च – १,३१,८९६ कोटी
- निवृत्ती वेतनावरील खर्च – ५६,३०० कोटी
- रिक्त पदे – २.७३ लाखांहून अधिक
- दोन वर्षे वयोमर्यादा वाढली, पण ७ वर्षांत भरतीच नाही – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६० हजार पदभरती करण्याची घोषणा केली होती. पण, निवडणुकीच्या आचारसंहितेसह विविध अडचणींमुळे त्यावेळी पदभरती होऊ शकली नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारने ७५ हजार पदभरतीची घोषणा केली. आजवर सात वर्षे झाली, पण मोठी पदभरती झाली नाही. राज्यातील बेरोजगारी प्रचंड वाढली असून त्याची प्रचिती पोलिस भरतीत आली. १८ हजार जागांसाठी तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी उमेदवारांच्या नोकरभरतीच्या दोन संधी वाढविल्या. मात्र, साधारणतः: तीन महिने संपले, पण भरती अजून सुरु झाली नाही.
राज्यातील 75 हजार कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्तीचा निर्णय
As per the latest updates about the the mega bharti for 75 thousand posts – Today is the second day of the indefinite strike of the striking employees. Even on the second day, the employees are firm on their stand. But the state government has decided to fill up about 75 thousand posts through private contract method. Recruitment for Teacher, Accountant, Officer, Assistant and Constable Posts. Nine private institutions have been appointed for five years. Through these private companies, 136 different types of posts will be filled in the Government Semi-Government Corporations First Department. The Department of Industry and Labor has announced a government decision in this regard.
संपाचा आज दुसरा दिवस : संपकरी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र राज्य सरकारने सुमारे 75 हजार पदांची खाजगी कंत्राटी पध्दतीने पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक, लेखापाल, अधिकारी, सहाय्यक आणि शिपाई पदांची भरती केली जाणार आहे. नऊ खाजगी संस्थांची पाच वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे. या खाजगी कंपन्यांमार्फत सरकारी निमसरकारी महामंडळ आधी विभागात 136 प्रकारची विविध पदे भरण्यात येणार आहेत. उद्योग कामगार विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे.
Name of the posts / या पदांसाठी भरती होणार
प्रकल्प सल्लागार, संस्था प्रकल्प अधिकारी, वरिष्ठ अभियंता, लेखापरीक्षक, कनिष्ठ अभियंता, विधी अधिकारी, शिक्षक, जिल्हा समन्वयक, अधीक्षक, माहिती अधिकारी अशा पदांसाठी ही भरती असेल. ॲक्सिस टेक सर्विसेस लि., सी.एम.एस. आयटी सर्विसेस लि., सीएससी ई गव्हर्नर सर्विस इंडिया लि., ईनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि., क्रिस्टल इं टग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लि., एस-2 इन्फोटेक इंटरनॅशनल लि., सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड., सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड., उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपन्यांना कामे देण्यात आले आहेत.
- जुन्या पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपाचा अत्यावश्यक सेवांवर विपरीत परिणाम होत असल्याने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे संप मोडीत काढण्याचे हालचाली सुरू केले आहेत. एकीकडे संप मागे घ्यावा, यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे मेस्मासारखा कायदा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात मंजूर केला.
- जुन्या पेन्शन बाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी समिती : संपकरी कर्मचारी संघटनेने या भरतीला तीव्र विरोध केला आहे. एकीकडे राज्य सरकार जुन्या पेन्शन बाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी समिती नेमतो. दुसरीकडे अशा पद्धतीने खाजगी कंत्राटी पदे भरण्याचा निर्णय घेतो, हे गंभीर आहे. खासगी भरतीमुळे लोकांची कामे आणि शासना बद्दलची विश्वासार्हता टिकून राहील का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी उपस्थित केला.
आता सरकारसाठी नऊ एजन्सी नेमणार खासगी तत्त्वावर कर्मचारी; १३६ प्रकारची पदे भरली जाणार
सरकारकडून ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली असतानाच खासगी तत्त्वावर कर्मचारी भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकाऱ्यांपर्यंतची पदे थेट खासगी एजन्सीच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून घेण्यात आला. ९ एजन्सीजच्या माध्यमातून सरकारी, निमसरकारी अस्थापने, महामंडळांत १३६ प्रकारची पदे भरली जातील.
प्रशासनातील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी बाह्ययंत्रणेमार्फत कामे करून घेण्याचे सरकारचे धोरण आहे. यासाठी मनुष्यबळ नेमण्यासाठी सरकारने एजन्सी नेमल्या आहेत.
- अतिकुशल कर्मचारी पदे -प्रकल्प अधिकारी, समन्वयक, कन्सल्टंट, प्रशिक्षण व्यवस्थापक, इंजिनीअर, अकाऊंटंट, मार्केटिंग एक्स्पर्ट, लेखापाल, विधी अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, ऑडिओ व्हिज्युअल कोऑर्डिनेटर, टेक्निकल आर्किटेक्ट, हार्डवेअर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, डेटा एण्ट्री ऑपरेटर, ग्राफीक डिझायनर, सोशल मीडिया एक्सपर्ट, सर्व्हेअर (७४ प्रकारची पदे). वेतन २८ हजार ते १.५० लाख रुपयांपर्यंत.
- कुशल कर्मचारी पदे – इस्टेट मॅनेजर, लायब्रेरेरियन, जनसंपर्क अधिकारी, बँक समन्वयक, उप लेखापाल, हेड क्लार्क, होस्टेल मॅनेजर, जुनिअर अकाऊंटंट, स्टोअर किपर, स्टेनोटायपिस्ट, सिनिअर क्लार्क,टेलिफोन ऑपरेटर, ड्रायव्हर, निरीक्षक, ट्राफिक वॉर्डनय (४६ प्रकारची पदे). वेतन २५ हजार ते ७३ हजारांपर्यंत.
- अर्धकुशल कर्मचारी पदे – केअरटेकल स्त्री-पुरुष, सुतार, माळी, सफाई कामगार, लिफ्टऑपरेटर, स्टोअर असिस्टंट (आठ प्रकारची पदे). वेतन २५ हजार ते ३२ हजार रुपयांपर्यंत.
- नेमण्यात आलेल्या एजन्सीज – ॲक्सेस टेक सर्व्हिसेस लि., सीएमएस आयटी सर्व्हिसेस प्रा. लि., सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि., इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि., क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि., एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल प्रा. लि., सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि., सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि., उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा. लि.
As per the information the state government is ready to provide independent options to Trutiypanthiy candidates just like male and female candidates in the application for admission to government jobs and education sector. Advocate General Birendra Saraf informed the High Court that the committee will submit a report with policy recommendations within two months. Read the more details regarding this below on this page.
नोकरभरती, शिक्षणामध्ये तृतीयपंथीयांना मिळणार संधी; राज्य सरकारची माहिती
तृतीयपंथीयांना सरकारी नोकरी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रवेशाच्या अर्जात पुरुष आणि महिला उमेदवारांप्रमाणेच तृतीयपंथीय उमेदवारांना स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारने तयारी दर्शविली असून त्या संदर्भात धोरण आखण्यासाठी पुढील आठवड्यात समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती त्यानंतर दोन महिन्यांत धोरणाबाबतच्या शिफारशींचा अहवाल सादर करेल, अशी माहिती अॅडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात दिली. तसेच पोलीस दलातील हवालदार आणि चालक पदासाठीच्या भरतीप्रक्रियेतील तृतीयपंथीच्या शारीरिक मानकातही पोलीस भरती नियमांमध्ये एका आठवड्यात सुधारणा पूर्ण केली जाईल, अशी माहितीही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली.
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतील (महाट्रान्स्को) १७० रिक्तपदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीत तृतीयपंथीयांसाठीही अर्ज करण्याची तरतूद केली होती. मात्र, त्यांच्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले नसल्याने तृतीयपंथीय विनायक काशीदच्या वतीने अॅड. क्रांती एल. सी. यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कंपनीने तृतीयपंथीयांसाठी आरक्षण ठेवले नसल्याचे याचिकेत स्पष्ट करण्यात आला आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
- मागील सुनावणीच्या वेळी खंडपीठाने गंभीर दखल घेत सरकारी नोकरभरतीत तृतीयपंथीयांना आरक्षण का नाही, अशी विचारणा राज्य सरकारला केली होती. त्यावर सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याचे आणि त्यांना आरक्षण देण्याबाबतचे धोरण आखण्यात येण्यार असल्याची हमी सरकारने न्यायालयाला दिली होती.
- त्यानुसार सरकारच्या वतीने अॅडव्होकेट जनरल महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी तृतीयपंथीयांना सर्व खात्यांतील नोकरभरती आणि शिक्षण क्षेत्रात प्रवेश देण्यासाठी अर्जामध्ये स्वतंत्र पर्याय देण्याची तयारी दर्शवली. त्याची दखल घेत खंडपीठाने याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब ठेवली.
- सरकारी खात्यांतील नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशाच्या अर्जांत तृतीयपंथीयांसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांच्या बरोबरीने स्वतंत्र पर्याय उपलब्ध केला जाईल. या संदर्भात पुढील आठवडाभरात समिती स्थापन करण्यात येईल.
- पोलीस दलातील हवालदार आणि चालक पदासाठीच्या भरतीप्रक्रियेतील तृतीयपंथीयांचे शारीरिक निकष ठरवण्याच्या दृष्टीने आठवडाभरात पोलीस भरती नियमांमध्ये आवश्यक ती सुधारणा केली जाईल.
- तृतीयपंथीयांना नोकरभरती व शिक्षण क्षेत्रात समाविष्ट करून घेण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. ही समिती त्यांना नोकरभरतीत सोईसुविधा देण्यासंदर्भातील अहवाल दोन महिन्यांत सादर करेल..
राज्यातील 75 हजार सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली
Good news for government job aspirants regarding the age limit & relaxation. The age limit for recruitment in direct service posts has been extended by two years. The General Administration Department has issued a circular in this regard. This has given great relief to the youth who are waiting for employment. Due to corona issue, there was no government recruitment in the state for two years. So the candidates who have passed the age limit could not apply for the job.
Age relaxation are as : Those candidates had demanded relaxation of age limit. Relaxation in upper age limit by two years i.e. if the upper age limit prescribed for open category is 38 years then it will be taken as 40 years and if it is 43 years for backward category then it will be taken as 45 years.
सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी खूशखबर आहे. सरळ सेवेत भरल्या जाणाऱया पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादा दोन वर्षे वाढवून देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. यामुळे नोकरभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे राज्यात सरकारी नोकरभरती झाली नव्हती. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हते. त्या उमेदवारांनी वयोमर्यादा शिथिल करण्याची मागणी केली होती. कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांनी शिथिलता म्हणजेच जर खुल्या प्रवर्गासाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा 38 वर्षे असेल तर ती 40 वर्षे ग्राह्य धरली जाईल व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे असेल तर ती 45 वर्षे ग्राह्य धरली जाईल.
Speaking on the congratulatory motion for the Governor’s address in the Assembly, Ajit Pawar said that the government has selected two companies, TCS and IBPS, for 75,000 mega recruitment; But these companies said that they cannot take the exam of lakhs of students. Therefore, the government should prepare a concrete program for recruitment by selecting companies which have the potential.
As soon as the government came to power, it announced to recruit 75 thousand posts in the Maharashtra state. However, 6 months have passed since this announcement about Mega Bharti, what happened to Mega recruitment? The unemployed youth of the state are disillusioned. Leader of Opposition Ajit Pawar warned the government that you should not see the end of their patience.
राज्यातील 75 हजार नोकरभरती प्रक्रियेला कधी सुरुवात होणार?
- सरकारने सत्तेवर येताच राज्यात ७५ हजार पदांची नोकरभरती करण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा करून सहा महिने होऊन गेले, भरतीचे काय झाले? राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींचा भ्रमनिरास झाला आहे. तुम्ही त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला.
- विधानसभेत मांडलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारने नोकर भरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएस या दोन कंपन्यांची निवड केली; पण आपण लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नाही, असे या कंपन्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने ज्या कंपन्यांची क्षमता आहे, अशा कंपन्यांची निवड करून भरतीबाबत ठोस कार्यक्रम तयार करावा.
Mega Bharti 2023 updates on 14th Feb. 2023 for 75,000 Posts is given here. Chief Minister Eknath Shinde announced to fill 75 thousand posts but now the government has directed to prepare a new form. In this, some posts will increase and some designations will decrease. So the recruitment process will be get delay. Now the government has given instructions to all the departments to create a new framework. Accordingly, the revised format will be prepared. Read the more details given here.
Coming Recruitment GR in March 2023 :
मार्च २०२३ मध्ये येणाऱ्या भरतीचे GR येथे पहा..
राज्यातील 75 हजार नोकरभरती प्रक्रियेसाठी नवीन GR लवकरच
- राज्य सरकारने७५ हजार पद भरतीची घोषणा केली आहे. त्याकरिता रिक्त पदांची माहितीही शासनाकडून मागविण्यात आली. परंतु आता नव्याने -आकृतिबंध तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले. यामध्ये काही पदे वाढणार असून काही पदनाम कमी होतील. याचा परिणाम पद भरतीवर होणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडणार आहे. यामुळे शासकीय नोकरीची स्वप्न उराशी बाळगून असलेल्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे दिसते.
- देशासह राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप होत आहे.राज्यात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. रिक्त पदाचाआकडा लाखोंच्या घरात असल्याची माहिती आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवर याचा ताण वाढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ हजार पदे भरण्याचे जाहीर केले. परंतु ही पदे किती वर्षांत भरण्यात येतील, हे स्पष्ट नसल्याचे जाणकार सांगतात.
- स्थानिक स्वराज्य संस्थांनाही पद भरतीचे अधिकारी दिले. पद भरतीसाठी रिक्त पदांची माहितीही शासनाने मागविली. सर्व विभागांनी संबंधित माहिती शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविली. परंतु आता शासनाने नव्याने आकृतिबंध तयार करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या. त्यानुसार सुधारित आकृतिबंध तयार करण्यात येणार आहे.
Latest 75000 mega recruitment updates is that The Shinde-Fadnavis government has to prepare an action plan i.e. Recruitment Time Table of 75 thousand posts and announce that schedule As soon as possible. Otherwise, it is also predicted that this recruitment will get caught up in the code of conduct (aacharsanhita) and the government may suffer. According to the information received from the General Administration Department, the government has to prepare an action plan for the mega recruitment of 75 thousand seats and announce the schedule within a month.
राज्यातील 75 हजार पदांच्या नोकरभरतीचे वेळापत्रक सरकारला जाहीर करावे लागणार
‘मेगाभरती’ निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकणार? सरकारला जाहीर करावे लागणार वेळापत्रक
देशाच्या स्वातंत्र अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून शिंदे-फडणवीस सरकारने ७५ हजार पदांची शासकीय मेगाभरती होईल, अशी घोषणा केली. पण, घोषणेला महिना झाला तरीदेखील भरतीच्या दृष्टीने काहीच कार्यवाही झालेली नाही. आता महिनाभरात कृती आराखडा तयार करून वेळापत्रक जाहीर करावे लागेल, अन्यथा ही प्रक्रिया निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’ ला दिली.
- मागच्यावेळी लोकसभा निवडणूक २३ मे रोजी पार पडली होती. त्यामुळे मे २०२४ मध्ये लोकसभा तर ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक होईल. तत्पूर्वी, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या पावसाळ्यापूर्वी दोन टप्प्यात (९० ते १०० दिवस) निवडणूका होतील.
- प्रभागरचनेची तिढा पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातून सुटण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार वरिष्ठ अधिकारी प्रशासक म्हणून पाहत आहेत. त्यांचा मार्च २०२३ मध्ये एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईल. त्यामुळे उन्हाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजेल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
- या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारला ७५ हजार पद भरतीचा कृती आराखडा तयार करून वेळापत्रक (जाहिराती) जाहीर करावेच लागणार आहे. नाहीतर, ही भरती आचारसंहितेत अडकेल आणि त्याचा फटका सरकारला बसू शकतो, असाही अंदाज वर्तविला जात आहे.
- भरती करणाऱ्या कंपन्यांची ताकद कमीच – राज्यातील १८ हजार पोलिस भरतीसाठी तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले. हा अंदाज धरून ७५ हजार पदांच्या मेगाभरतीचे नियोजन करावे लागणार आहे. अंदाजित ४० लाखांहून अधिक अर्ज येतील. एका विभागाची परीक्षा एकाचवेळी घ्यावी लागेल. मात्र, सरकारने भरती प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कंपन्यांकडे तेवढे मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध नसल्याची स्थिती त्या कंपन्यांनी यापूर्वी सरकारला पाठवलेल्या पत्रानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारला भरती प्रक्रिया स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी सुरु करावी लागेल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
- उमेदवारांची संपतेय वयोमर्यादा – राज्य सरकारमधील १७ लाख पदे मंजूर पदांपैकी तब्बल पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. तरीपण महसूल, कृषी, शिक्षण, जिल्हा परिषद, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा, राज्य उत्पादन शुल्क अशा महत्वाच्या विभागांमधील पदे तातडीने भरली जाणार आहेत. मात्र, चार वर्षांपासून राज्यातील तब्बल ४० लाखांहून अधिक तरूणांना मेगाभरतीची प्रतीक्षा आहे. भरतीच्या प्रतीक्षेत दरवर्षी हजारो तरूणांची वयोमर्यादा संपुष्टात येऊ लागली आहे. कोरोना काळात ‘एमपीएससी’ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यासाठीच आंदोलन केले होते. त्यामुळे राज्य सरकार फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात मेगाभरती पूर्ण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Updates of Mega Bharti 2023 – The recruitment of 75000 posts in the state will be completed before 15th August 2023. Many obstacles are seen in the recruitment of employees. The state government will constitute a committee under the chairmanship of the chief secretary to remove these obstacles and conduct recruitment in a transparent manner. TCS has a capacity of 7500 to 8000 if the online exam is to be conducted in the state. Whereas IBPS can take exam from 10000 to 15000 at a time. If lakhs of candidates come, then the question of how to conduct the examination process has been raised.
राज्यातील 75 हजार पदांची नोकरभरती 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार आहे. नोकर भरतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होताना पाहायला मिळतात. हे अडथळे दूर करण्यासाठी आणि पारदर्शकपणे नोकर भरती राबविण्यासाठी राज्य सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार आहे.
Mega Bharti in August 2023 – राज्यातील 75 हजार पदांची नोकरभरती 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार
- राज्यातील 75 हजार पदांची नोकर भरती प्रक्रिया 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
- राज्यात पहिल्यांदाच सर्वात मोठ्या 75 हजार जागांसाठी ही नोकर भरती होणार आहे.
- राज्यात ऑनलाईन परीक्षा घ्यायच्या असेल तर टीसीएसचे 7500 ते 8000 पर्यंत क्षमता आहे.
- तर आयबीपीएस 10000 ते 15000 पर्यंत एकावेळी परीक्षा घेऊ शकतात.
- लाखांच्या संख्येने जर उमेदवार आले तर नेमकी परीक्षा प्रक्रिया कशी राबवायची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात ७५ हजार पदांच्या भरती राबविण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना – शंभूराज देसाई
As per the latest update given by Ministry Shambhuraj Desai is that Formation of a committee by the state government to implement the recruitment of 75 thousand posts in the state. The companies TCS and IBPS were appointed to carry out the recruitment process of 75 thousand employees. However, due to the limited number of centers these companies are unable to plan if the number of candidates appearing for the exam increases, there is a possibility that 75 thousand recruitment will be delayed.
- 75 हजार नोकर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या कंपन्यांकडे मर्यादित सेंटर असल्यामुळे परीक्षा देणार्या उमेदवारांची संख्या वाढल्यास त्याचे नियोजन करण्यासाठी या कंपन्या असमर्थ ठरत असल्यामुळे 75 हजार भरती रेंगाळण्याची शक्यता दिसून येत आहे.
- राज्य सरकार यावर तोडगा काढण्यासाठी नोकर भरतीबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती दोन दिवसांत निर्णय घेणार आहे. एवढी मोठी नोकरभरती राबविण्यासाठी अडथळे कसे दूर करायचे यावर समिती काम करणार असून, नोकर भरतीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. राज्य सरकारने नोकर भरती घेण्यासाठी टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. मात्र भंडारा जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक ठिकाणी या दोन्ही कंपन्यांचे सेंटर नाहीत. त्यामुळे परीक्षा घ्यायच्या कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या भरतीसाठी राज्यभरातून जवळपास 15 लाख उमेदवार अर्ज करण्याची क्षमता मात्र दोन्हीही कंपन्यांची एवढी क्षमता नाही.
- टीसीएस कंपनी एकावेळी राज्यात 7500 ते 8000 पर्यंत उमेदवारांची परीक्षा घेऊ शकते तर आयबीपीएस कंपनी दहा हजार ते पंधरा हजार एका वेळी एका शिफ्टमध्ये परीक्षा घेऊ शकतात. त्यामुळे या कंपन्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त अर्ज आले तर परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदस्य सचिव जिल्हा निवड समिती भंडारा यांनी ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून माहिती दिली आहे. त्यामुळे 75 हजार नोकर भरती रेंगाळण्याची शक्यता आहे.
- राज्य सरकारच्या 75 हजार नोकर भरती पुन्हा रेंगाळण्याची शक्यता आहे. कारण एकाच वेळी राज्यभरात परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या दोन्ही नियुक्त कंपन्या एकाच वेळी परीक्षा घेण्यास असमर्थ असल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या 75 हजार पदांच्या भरतीच्या वेगाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
- ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी केंद्रांची संख्या अपुरी – राज्यात 75 हजार नोकरभरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे यासंदर्भात संबंधित कंपन्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे. जिल्हा निवड समिती भंडारा यांनी आक्षेप घेतल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. नोकरभरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारने टिसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. मात्र या कंपन्यांकडे मर्यादित परीक्षा सेंटर आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात यावर निर्णय होणार आहे.
As per the Latest information received from news source due to the lack of co-ordination in the Mega Recruitment 2023 for 75000 there are signs of a break in the speed of recruitment process. It has been decided to recruit the vacant posts of Group C & Group D in various departments at revenue departmental level. For this, regional appointing officers of each department have been appointed in each revenue department. In some accounts only 1 to 2 similar posts are vacant in each revenue division. For these vacancies, the process of publishing a separate advertisement in each revenue department, entering into separate contracts with the companies for carrying out the recruitment process and conducting a separate examination for the same post in each department are all necessary. For this, the government has appointed TCS and IBPS companies. Carrying out the entire recruitment process for one or two positions is a headache for these companies and is also time consuming.
७५ हजार पदांच्या भरतीला ब्रेक? सुसूत्रता नसल्याने ३ आणि ४ वर्गांच्या पदांची विभागीय भरती खोळंबली
- भरती प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७५ हजार पदांच्या भरतीच्या वेगाला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. विविध खात्यांमध्ये रिक्त असलेल्या वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती महसूल विभागीय स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक महसूल विभागात प्रत्येक खात्याचे प्रादेशिक नियुक्ती अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
- काही खात्यांमध्ये प्रत्येक महसूल विभागात केवळ १ ते २ समान पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी प्रत्येक महसूल विभागात स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करणे, भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कंपन्यांबरोबर स्वतंत्र करार करणे आणि प्रत्येक विभागात समान पदासाठी वेगळी परीक्षा घेणे ही सर्व प्रक्रिया राबवावी लागत आहे. त्यासाठी सरकारने टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. एक-दोन पदांसाठी संपूर्ण भरती प्रक्रिया राबविणे या कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, ती वेळखाऊही आहे.
- उदाहरण द्यायचे झाले तर कोकण महसूल विभागात पशुसंवर्धन खात्यात एका पदाची भरती करायची आहे, तर पशुसंवर्धन विभागात त्याच पदासाठी कोल्हापूर महसूल विभागात भरती करायची आहे. यासाठी कोकण आणि कोल्हापूर विभागांत भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्या विभागाच्या प्रादेशिक नियुक्ती अधिकाऱ्याला भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीबरोबर वेगवेगळे करार करावे लागणार, त्यानंतर संबंधित कंपनी त्या एका पदासाठी कोकण विभागात वेगळी आणि कोल्हापूर विभागात वेगळी परीक्षा घेणार, त्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असे चित्र असून यामुळे भरती प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत.
७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला वेग कसा येणार?
- महसूल विभागीय स्तरावर विविध खात्यांतील पदे भरण्यापेक्षा प्रत्येक खात्यातील विभागीय स्तरावरील रिक्त पदांची माहिती मुख्यालयाकडून मागवण्यात यावी आणि सर्व राज्यांसाठी एकत्रित भरती प्रक्रिया राबविण्यासाठी या कंपन्यांबरोबर एकत्रित करार करावा, असा पर्याय एका प्रादेशिक अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.
- लिपिक, टंकलेखक यांच्या विविध महसूल विभागातील भरतीसाठीही रिक्त जागांची माहिती मुख्यालयातून मागवण्यात येते. प्रत्येक महसूल विभागाकडून आलेली रिक्त पदांची माहिती एकत्रित करून या पदांच्या भरतीसाठी कंपन्यांबरोबर मुख्यालयातून एकत्रित करार जातो आणि या कंपन्या एकत्रित परीक्षा घेतात आणि वेगाने भरती प्रक्रिया पूर्ण होते.
- अशाच पद्धतीने रखडलेल्या ३ आणि ४ वर्गच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी सर्व महसूल विभागांतून मुख्यालयांनी रिक्त पदांची एकत्रित माहिती मागवली आणि मुख्यालयातूनच कंपन्यांबरोबर एकत्रित करार करून भरती प्रक्रिया राबवली तर भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल
राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्या, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
Latest Mega Bharti 2023 updates is here. Chief Minister Eknath Shinde directed to speed up the recruitment process for 75 thousand posts in the Maharashtra state on Tuesday meeting. Official Advertisement in this regard will be released in the first week of January 2023. 14 various important government departments were presented regarding recruitment. In order to speed up the process of filling up the vacant posts, the Cabinet took a thorough review of 14 departments and gave instructions. Maharashtra Public Service Commission will be recruiting for the post of Clerk Typist across the state. For more information visit www.govnokri.in.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक टंकलेखक या पदासाठी भरती होणार आहे. या संदर्भातील जाहिरात जानेवारी २०२३मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल.
Mega Bharti 2023 For 75000 Posts– An important decision has been taken for lakhs of candidates who are waiting for recruitment in the state. Now the competitive exams for recruitment in the state will be conducted by TCS-ION and IBPS companies. Read More details about Mega Bharti 2022 are given below.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. आज झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 15 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. यात राज्यातील नोकरभरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड ही पदे सरळ सेवेने भरताना आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या अनुषंगाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन आज या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या कराराच्या प्रारुपास मान्यता देण्यात आली.
संबंधित विभागाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करायचा आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळं 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- राज्य सरकारकडून नुकतीच 75 हजार सरकारी नोकर भरतीची घोषणा केल्यानंतर आज आरोग्य विभागाकडून देखील मोठ्या नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
- मागील काळात सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. यात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेकडून देखील मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ झाल्याचं पाहायला मिळाला होता. कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये नोकर भरती होऊ शकलेली नाही.
- त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत ही वेगवेगळ्या विभागाच्या नोकर भरती होताना पाहायला मिळतील.
- मात्र गेल्या काळात नोकर भरती करत असताना अनेक वादग्रस्त निर्णय होताना पाहायला मिळाले आहेत. आता पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार कशा पद्धतीनं करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे
नोकरीची संधी : महाराष्ट्रात 75000 पदांची भरती; कोणत्या खात्यात जागा किती?
Latest updates announce Yesterday (3rd Nov. 2022) for mega bharti 2022 for 75000 posts. In the online presence of Prime Minister Narendra Modi, out of 75000 posts, 2000 people were given job certificates across Maharashtra. Programs were held in all the divisional offices in Maharashtra. Now the recruitment for the posts of Home Department, Public Health Department, Water Resources Department, Revenue and Forest Department, Medical Education Department, Public Works Department, Tribal Department, Social Justice Department will be released soon for 75000 posts. Due to this decision taken by the government, the way has been cleared for 75000 posts in 29 departments of the government. The state government has issued a government order in this regard. Read the department wise vacant posts details below on this page.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील 75,000 रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत काल (3rd Nov. 2022) या 75,000 पदांपैकी 2,000 जणांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची प्रमाणपत्रे देण्यात आली. महाराष्ट्रात सर्व विभागीय कार्यालयांमध्ये याचे कार्यक्रम झाले. आता गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75,000 पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.
Mega Bharti 2022 vacancy Details
कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने नोकरभरतीवर निर्बंध आणले होते. परंतु आता कोरोना काळ संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे १०० टक्के नोकर भरती होणार आहे.
कोणत्या विभागात अंदाजित किती नोकर भरती होणार ?
- आरोग्य खाते : १० हजार ५६८
- गृह खाते : १४ हजार ९५६
- ग्रामविकास खाते : ११ हजार
- कृषी खाते : २ हजार ५००
- सार्वजनिक बांधकाम खाते : ८ हजार ३३७
- नगरविकास खाते : १ हजार ५००
- जलसंपदा खाते : ८ हजार २२७
- जलसंधारण खाते : २ हजार ४२३
- पशुसंवर्धन खाते : १ हजार ४७
किती जागा रिक्त ?
- गृहविभाग : ४९ हजार ८५१
- सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२
- जलसंपदा विभाग : २१ हजार ४८९
- महसूल आणि वनविभाग : १३ हजार ५५७
- वैद्यकीय शिक्षण विभाग : १३ हजार ४३२
- सार्वजनिक बांधकाम विभाग : ८ हजार १२
- आदिवासी विभाग : ६ हजार ९०७
- सामाजिक न्याय विभाग : ३ हजार ८२१
Maharashtra Mega Bharti 2022-Important announcement regarding the Mega Bharti 2022 in Maharashtra is given here. The way for the recruitment of 75 thousand government posts has been cleared on the occasion of the Amrit Jubilee year of Indian Independence . TCS, IBPS will conduct the exam for Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D posts outside Maharashtra Public Service Commission. Through this, the way to fill 75 thousand posts has been cleared. (General Administration Department) will publish advertisement soon. For more information visit our website www.govnokri.in.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार सरकारी पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नोकर भरतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सोमवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याची सरकारची योजना आहे. त्यादृष्टीने आज वित्त विभागाने जीआर जारी केला आहे. त्यानुसार, शासनाच्या ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली आहे.
- तर, ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागांमधील गट अ, गट ब, गट क मधील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, वाहनचालक आणि गट ड संवर्गातील पदे वगळून या भरतीची मुभा देण्यात आली आहे.
- नोकरभरतीवरील निर्बंधांतून देण्यात आलेली ही सूट फक्त स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.
- त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तर, ३० सप्टेंबरच्या जीआरनुसार सुधारित आकृतिबंध निश्चित झालेल्या विभागांना एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली होती. अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याची मुभा होती. अन्य संवर्गातीलही पूर्ण पदभरतीचा मार्ग आजच्या जीआरने मोकळा झाला आहे.
संपूर्ण GR येथे वाचा
Today’s important announcement regarding the Mega bharti 2022 in Maharashtra is given here. Important decisions were taken in the cabinet meeting held today (i.e. 20th October 2022). In this meeting, instructions were given regarding mega recruitment for 75000 posts. Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis today directed to recruit 75 thousand mega bharti will be started as soon as possible. TCS, IBPS will conduct the exam for Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D posts outside Maharashtra Public Service Commission. Through this, the way to fill 75 thousand posts has been cleared. (General Administration Department) will publish advertisement soon. For more information visit our website www.govnokri.in.
दिवाळी रोजगाराची! पंतप्रधान मोदी तरुणांना देणार 75000 नोकऱ्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस मार्फत नामनिर्देशनाद्वारे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.
Mega Bharti 2022 for 75000 posts
मागील वर्षाच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे असे ठरले होते. त्याप्रमाणे भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.
Maharashtra Mega Bharti 2022 – Government Recruitment Exam will be conducted though the reputed company like IBPS & TCS. Now government recruitment will be given priority through TCS, IBPS companies only. Candidates Read the complete details given below on this page regarding the MegaRecruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परिक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील.
Mega Bharti 2023 For 75000 posts will be held soon
Mega Bharti 2023 for 75000 posts – Advertisement, Vacancy & Apply Link
[email protected]
Rakesh sanjeev Natekar 12 pass शिक्षण B, S, C, टायपिंग ऐमेसियाटी पास आय टि या पास डिझेल मेकॅनिक गारमेंट पास S, T,. महामंडळ वाहक लायसन्स परवाना जात मनेवार 9960328372
Rakesh Sanjeev Natekar 10 pass 12 pass टायपिंग ऐमेसियाटी पास शिक्षण B, S, C, आय टि या पास डिझेल मेकॅनिक गारमेंट पास ऐस टी महामंडळ वाहक लायसन्स परवाना जात मनेवार S, T, 9960328372 9860933681
Mega Bharti 2022 – राज्यात शासकीय मेगाभरती परीक्षा कंपन्यांमार्फत घेणार सरकाची घोषणा